रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रत्नागिरीत घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. प्रदीप कुमार आणि मोहम्मद आसिफ अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
JSW कंपनीचे तिघे कर्मचारी रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते. यापैकी दोघे जण समुद्रात पोहायला गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. एकाला वाचवण्यात यश आले आहे.