नवीमुंबई : मुंबईत आपघातांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. एक भरधाव कार जुईनगर येथील स्थानकासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षाला जाऊन धडकली. यात दोन रिक्षासह कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर मृत रिक्षा चालकाचे नाव घनश्याम यादव यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी पहाटे ६ च्या दरम्यान, सायन-पनवेल मार्गावर असलेल्या जुईनगर येथील बसस्थानकावर दोन रिक्षा या प्रवाशांची वाट पाहत उभ्या होत्या. रिक्षा चालक घनश्याम यादव हे देखील त्यांच्या रिक्षाच्या शेजारी उभे होते. यावेळी एक कार भरधाव वेगात आली आणि त्यांना आणि त्यांच्या रिक्षाला जोरदार धडकली. यात गंभीर जखमी झाल्याने घनश्याम यादव यांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात एक कार जात होती. या कारने जुईनगर स्थानकावर उभ्या असलेल्या दोन रीक्षांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना दवाखान्यात दाखल केले. मात्र, रिक्षा चालक घनश्याम यादव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघात आणखी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांची नावे समजू शकली नाही. कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने दोन्ही रिक्षांवर जाऊन कार आदळली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
या अपघातात दोन्ही रिक्षा व कारचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य राबवले. याची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. अपघातानंतर येथे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत तिन्ही वाहने बाजूला केली. तसेच जखमींना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. नेरुळ पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.