तरुणांचा मोठा सहभाग, निसर्ग फुलविण्याचा संकल्प
शशिकांत मोरे
धाटाव : प्रामुख्याने शेती, निसर्ग यावर काम करण्यासाठी सक्रीय असलेल्या बळीराजा फाऊंडेशनचा विभागीय महावृक्षारोपणाचा दुसरा टप्पा रविवारी पूर्ण झाला. तळाघर, बोरघर, लांढर, वाशी गावातील रस्ता दुतर्फा तलाव, मैदान, बंधारा परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. बळीराजा फाऊंडेशनने पुढाकार घेतलेल्या वृक्षारोपण उपक्रमात विभागातील तरुणांनी मोठा सहभाग घेतला. संकल्प बळीराजाचा, निसर्ग फुलविण्याचा असा जयघोष यावेळी करण्यात आला. बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या हस्ते सकाळी मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून महावृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर जिल्ह्यातील प्रसिद्ध तळाघर धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या बंधाऱ्याशेजारी वृक्षरोपण करण्यात आले. त्यानंतर बोरघर, लांढर, वाशी हद्दीतील रस्ता दुतर्फा, तलाव, मैदानालगत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अन्शूल कंपनीचे मॅनेजर लक्ष्मण शिट्याळकर, युवा नेतृत्व जयवंत मुंढे, उद्योजक राम नाकती, मुकेश भोकटे, अनिल भगत, दिनेश पाशिलकर, पत्रकार शशिकांत मोरे, रंगीत फुलांचे शहरप्रमुख सुरेंद्र निंबाळकर, विलास जाधव, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, सतीश भगत, कृष्णा बामणे, अनंत मगर व तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी, कालव्याच्या पाण्यातून परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी बळीराजा फाऊंडेशनची स्थापना झाली. कालव्याला पाणी हा बळीराजा फाऊंडेशनचा पहिला अजेंडा आहे. त्यासोबत कृषी, पंचायत समिती व अन्य संस्थांच्या योजना उपक्रमांचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी बळीराजा फाऊंडेशन कार्यरत झाला आहे. त्याच उद्देशाने बळीराजा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, श्री विवेकानंद संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. विभागात धरण, शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी उपक्रम लवकरच सुरू होणार आहे. याच उपक्रमांच्या अनुषंगाने रविवारी बळीराजा फाऊंडेशनने संकल्प बळीराजाचा, निसर्ग फुलविण्याचा या ब्रीदवाक्य संकल्पनेतून रविवारी पूर्ण विभागात महावृक्षारोपणाचा जागर केला. वृक्षारोपण कार्यक्रमाला विभागातील युवा नेतृत्व, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तळाघर येथील धबधबा परिसर, बोरघर, लांढर, वाशी हद्दीतील रस्ता दुतर्फा, तलाव, मैदान सभोताली वृक्षारोपण करण्यात आले. लांढर येथे उपस्थित अन्शूलचे मॅनेजर लक्ष्मण शिट्याळकर, युवा नेतृत्व जयवंत मुंढे, उद्योजक राम नाकती, मुकेश भोकटे व अन्य मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. बळीराजा फाऊंडेशनने खूप चांगले उपक्रम हाती घेतले, सहभागी शेतकरी, तरुणांचा सहभाग नवीन ऊर्जा देत आहे, आम्हीही उपक्रमाला अधिक प्रोत्साहन देऊ अशी भावना शिट्याळकर यांनी व्यक्त केली. संस्थापक राजेंद्र जाधव यांनी बळीराजा फाऊंडेशनच्या ध्येय धोरणाची माहिती दिली. शेती, निसर्ग यावर प्रामुख्याने बळीराजा फाऊंडेशन काम करणार आहे. कालव्याला पाणी आणणे हा आमचा पहिला ठराव आहे, त्याला आपण सर्वांनीच पाठबळ द्यावे असा पूनर्रच्चार जाधव यांनी केला.

संकल्प बळीराजाचा, निसर्ग फुलविण्याचा या बळीराजा फाऊंडेशनच्या उपक्रमाला विभागातून चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील असंख्य तरुण, ग्रामस्थांनी महावृक्षारोपणात सहभाग घेत झाडे संवर्धनाचा संकल्प केला. युवा नेतृत्व अमित घाग यांनी झाडे उपलब्ध करून दिली. बळीराजा फाऊंडेशनच्या उपक्रमात कंपनीचे अधिकारी लक्ष्मण शिट्याळकर यांसह उद्योजक राम नाकती, युवा नेतृत्व जयवंत मुंढे, मुकेश भोकटे, अमित मोहिते, सतीश भगत, जगदीश भगत, कृष्ण बामणे व सर्वच युवा नेतृत्वाने सहभाग घेतला. बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष तुकाराम भगत, सागर भगत, सचिव ऍड. दीपक भगत, खजिनदार रुपेश साळवी, सचिव महेश कांबळे, हेमंत माने, राम महाडीक, राजेंद्र बामुगडे, भाई मोरे, परशुराम कांबळे, स्वप्निल भगत, परशुराम माने, लक्ष्मण भगत, रवी मगर, निलेश जंगम, प्रशांत बर्डे, विकास जोगडे, विकास बामणे, प्रथमेश माने यांनी महावृक्षारोपण उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन राम महाडिक यांनी केले. दरम्यान, बळीराजा फाऊंडेशन ही तालुक्यात सक्रीय संघटना म्हणून नावरूपाला आली. शासकीय अधिकारी, सेवाभावी संस्थांनी बळीराजा फाउंडेशनच्या कामांचे विशेष कौतुक केले आहे. आता बळीराजा फाऊंडेशन विभागात काय काय लोकोपयोगी उपक्रम राबविणार आहे, हे अधोरेखीत होणार आहे.
