अनंत नारंगीकर
उरण : पावसाने हुलकावणी दिल्याने भातशेती पावसाअभावी कोमेजून, करपून जात असताना शुक्रवारी (दि २३) आलेल्या पावसाने भात पिकांना काहीसा दिला मिळाला आहे. एकंदरीत कमी अधिक पडणाऱ्या पावसामुळे उरण तालुक्यातील काही अंशी भात शेतीला नवसंजीवनी मिळाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
उरण तालुका हा डोंगर कुशीत – खाडीकिनारी वसलेला तालुका आहे.या तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे आपल्या शेतजमीनीत पावसाळ्यात भाताचे पीक घेत आहेत.मात्र जुलै महिन्यात भात रोपांची लागवड झाल्यानंतर आँगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने लागवडी खाली आलेली भाताची रोपे ही पावसा अभावी कोमेजून करपून जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला.मात्र शुक्रवारी( दि २३) पावसाने पडण्यास सुरुवात केल्याने भाताच्या रोपांना काही अंशी दिलासा मिळाला असल्याने शेतकरी सध्या तरी सुखावला आहे.