• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सांगवड येथील बीएसएनएल टॉवर गेली २० ते २५ वर्षे दुर्लक्षित; गावकऱ्यांची गैरसोय

ByEditor

Jul 31, 2023

वैभव कळस
म्हसळा :
तालुक्यातील मौजे सांगवड हा अत्यंत डोंगराळ आणी ग्रामिण परिसर आहे. गाव अतिशय उंचावर असल्याने २५ वर्षांपूर्वी परिसरातील अनेक ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या टॉवरची मागणी तत्कालीन खासदार बॅ. ए. आर. अंतूले यांचेकडे केली होती. त्याप्रमाणे सांगवड येथे टॉवर उभारण्यात आला. मात्र तो टॉवर सुरु व्हावा हि मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत असतानाही संबंधित खात्याकडून दखल घेतली गेली नाही. आजही आवश्यकता असतानाही आणि अनेक ग्राहक जोडणी घ्यायला तयार असतानानाही ग्रामस्थांना कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात, ही बाब अत्यंत दुर्दैवी असून याला वाचा फोडावी म्हणून ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करून रविप्रभा मित्र मंडळातर्फे संस्थापक रविंद्र लाड यांनी म्हसळा येथील मुख्य कार्यालयात संबंधित अधिकारी यांना लेखी निवेदन दिले.

जर हा टॉवर सुरु झाला तर परिसरातील ठाकरोली, कोकबलन्यू अनंत वाडी, तोराडी आणि आजबाजूचा परिसर यांना निश्चितपणे फायदा होईल. रविंद्र लाड यांनी आणि संस्थेचे सल्लागार संतोष उद्धरकर यांनी म्हसळ्याचे जनरल टेलिफोन ऑफिसर अखतर खान यांना कार्यालयात जावून निवेदन दिले.

सांगवड टॉवर काही तांत्रिक कारणास्तव बंद झाले होते. त्यामुळे आम्हाला आमच्या असंख्य ग्राहकांना सेवा देता आली नाही व थोडेसे नुकसान सहन करावे लागले. पण आम्ही लवकरात लवकर तो टॉवर सुरू करून देतो.
अखतर खान
जनरल टेलिफोन आँफिसर
बीएसएनएल कार्यालय, म्हसळा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!