• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पर्यटनाचे सुयोग्य नियोजन झाल्यास उद्योग व्यवसाय उत्तुंग भरारी घेईल -संजय यादवराव

ByEditor

Aug 12, 2023

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
प्रत्यक्षपणे पर्यटनाचे व्यवस्थित नियोजन केलं तर कोकणातील तरुणांना मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरीला जाण्याची गरज नाही त्यासाठी शासनच करेल यावरच न थांबता कोकणातील प्रत्येक नागरिकांची साथ गरजेची असल्याचे मत कोकण क्लब व कोकण फोरमचे संस्थापक संजय यादवराव यांनी केले. दिवेआगर येथे कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब व कोकण बिझनेस फोरम यांच्यावतीने दक्षिण रायगडसाठी पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

दिवेआगर येथे नुकतीच पर्यटन वाढावा या हेतूने कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब व कोकण बिझनेस फोरम यांच्या वतीने दक्षिण रायगडसाठी पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होती याप्रसंगी कोकण क्लबचे संस्थापक संजय यादवराव, अध्यक्ष संजय शिर्के, ईगल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मकरंद केसरकर, आर्किटेक्ट डिझायनर राजन कुमठेकर, महालक्ष्मी हाऊस बोर्ड महेश सानप, संदीप भोसले, कोकण क्लबचे सचिव मनोहर चोपडे, विसावा हेल्थ रिसॉर्ट शशिकांत महाडकर, कोकण प्रदेश समन्वयक प्रशांत परब उपस्थित होते.

पर्यटन व्यवसाय वाढीसाठी व्यवसायिकांना माहिती देण्यात आली यामध्ये सहाशे पर्यटन बॅक वॉटर, रिव्हर राफ्टिंग, पर्यटन कृषी पर्यटन, इको टुरिझम, तिर्थटन व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या याचे मार्गदर्शन करण्यात आले. दिवेआगरचे माजी सरपंच बाळकृष्ण गणेश बापट यांची जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली. यावेळी कोकण क्लब संस्थापक संजय यादवराव यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सांगितले की, पर्यटन हॉटेल्स, रिसॉर्ट, घरगुती राहण्याची व्यवस्था व अन्य असे जवळपास 25 हजार उद्योग आहेत आणि प्रत्येक बीचवर स्टॉल्स, घोडेवाले, उंटवाले, मंदिर परिसरात स्टॉल्स असे जवळपास 50 हजार उद्योजक आहेत आणि जवळपास तीन लाख लोकांना थेट रोजगार मिळतो आणि अप्रत्यक्षपणे पाच लाख कुटुंबांना रोजगार मिळतो आणि प्रत्येक पर्यटनाचे व्यवस्थित नियोजन केलं तर कोकणातील तरुणांना मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरीला जाण्याची गरज नाह, सरकार करेल अशी वाट पाहण्यापेक्षा कोकणातील सर्वच पर्यटन व्यवसायिकांनी एकत्र येऊन कोकणचा ब्रँड टुरिझम कसं तयार करता येईल व तो पर्यावरण पूरक कसा असेल तो शाश्वत कसा असेल तो प्लास्टिक मुक्त असेल तर खऱ्या अर्थाने भारत देशाचा प्रतिनिधीक स्वरूपात प्रेझेंटेशन करणारा सांस्कृतिक ब्रँड कसं असेल यावरती कोकणातील सर्व पर्यटन व्यावसायिक काम करतील व या ठिकाणी लोक चळवळ उभी करण्याचे प्रयत्न कोकण क्लबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असे यादवराव म्हणाले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!