कारवाईसाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘आवाज’ची तक्रार
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील किहीम आणि आवास समुद्र किनाऱ्यावर दररोज अनेक बैलगाड्यांमधून वाळू उत्खनन होत आहे. आवाज फाउंडेशनच्या सुमायरा अब्दुलली यांनी यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. करोनापूर्वीच्या काळात हे प्रमाण कमी झाले होते, मात्र करोनानंतरच्या काळात पुन्हा एकदा किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू झाले असल्याचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे.
किहीमचे तलाठी व्ही. शिंगाडे यांनी २६ मे रोजी किहीमच्या किनाऱ्यावर प्रत्यक्ष उत्खनन पाहण्यासाठी भेट दिली किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून एक माणूसभर खोल वाळू उपसा सातत्याने सुरू असल्याचे दिसत आहे. या किनाऱ्यावर सहा फूट खोल किंवा अधिक उत्खनन या किनाऱ्यावर सहा फूट खोल किंवा अधिक उत्खनन झाले आहे. अशा प्रकारचे उत्खनन हे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठीही धोकादायक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारचे उत्खनन हे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठीही धोकादायक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असल्याने किनाऱ्यावरील नारळाची अनेक झाडे पडली आहेत. काही ठिकाणी किनाऱ्याची खोली सुमारे १२ फूट खोल गेल्याचेही निदर्शनास आले आहे, अशी तक्रार अब्दुलली यांनी नोंदवली आहे.
आवास किनाऱ्याजवळ अवैधरित्या भरावही घालण्यात येत आहे. आवास आणि किहीम या दोन किनाऱ्यांना खाडी विभागते. आवास किनाऱ्यावर दगडांमुळे किनाऱ्याचा भाग वाढत आहे. तर, वाळू उत्खननामुळे किहीमचा किनारा मात्र कमी होत आहे. किहीम ग्रुप ग्राम पंचायतीने वाळू उत्खननावर २००४ नंतर बंदी घातली होती. मात्र, सध्या किहीम ग्रुप ग्राम पंचायत परिसरातही वाळू उत्खनन सुरू आहे.
यासंदर्भात सखोल तपास होऊन किहीम आणि आवास या दोन्ही किनाऱ्यांवर सुरू असलेला वाळूउपसा थांबणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे.