घन:श्याम कडू
उरण : स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात जासई येथून करण्यात आली. दोनवेळा मावळचे खासदार असलेले श्रीरंग बारणे हे स्थानिकांच्या समस्या व प्रश्न मार्गी लावण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत. केंद्राच्या DPD धोरणामुळे पंधरा ते वीस हजार तरुणांना रोजगार गमवावे लागले. उरण विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झालेली आहे. उरणला सुसज्ज हॉस्पिटल नाही, नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. विविध पोर्टमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची भरती होत आहे, त्याच्यावर खासदार तोंड उघडायला तयार नाहीत. उलट JNPT चा CSR फंड हा RSS च्या संघटनांना परस्पर दिला जातो. स्थानिकांसाठी फंड वापरला जात नाही. खासदारांनी आपल्या मुलाच्या नावे पार्किंग बळकावून स्वतःची पोळी भाजण्याचे काम केले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल.

मागच्या लोकसभेच्या निवडणुकी वेळी शिवसेना व भाजप एकत्र असून सुद्धा पार्थ पवारांना बरोबरीची मते मिळाली होती. आताच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे संजोग वाघेरे पाटील यांना ५० हजारांची आघाडी उरण विधानसभेतून मिळेल असे भाकीत रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले.
संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचार रॅलीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बबनदादा पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील, प्रीतम म्हात्रे, रवि घरत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, कॉम्रेड भूषण घरत, माजी सभापती नरेश घरत, शेकाप उरण तालुका चिटणीस विकास नाईक, कॉंग्रेस पक्षाचे मिलिंद पाडगांवकर, मार्तंड नाखवा, किरीट पाटील, अखलाख शिलोत्री, विनोद म्हात्रे, संजय ठाकूर, रेखा घरत, निर्मला पाटील, सीमा घरत, विनोद पाटील, प्रेमनाथ ठाकूर, रमाकांत म्हात्रे, आदित्य घरत, विवेक म्हात्रे, तसेच शेकडोंच्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.