• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाच्या कामाचे चुकीचे नियोजन

ByEditor

Jul 12, 2024

महामार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाश्यांचा खोळंबा

विश्वास निकम
कोलाड :
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड (पुई) येथील महिसदरा नदीच्या पुलावर गर्डर बसविण्याच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे सकाळी ९.३० पासुन १२.३० पर्यंत सुमारे तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याचा त्रास वाहनचालकांसह प्रवासी वर्गाला सहन करावा लागला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पुई-कोलाड येथील महीसदरा नदी पात्रावर नवीन पुलाचे गर्डर बसविण्याचे कामाची सुरवात करण्यासाठी ११ जुलैपासून ते १३ जुलैपर्यंत सकाळी ६ ते ८ व दुपारी २ ते ४ या वेळेत फक्त चार तास सर्व प्रकारची वाहतूक महामार्गावरून बंद राहील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, परंतु आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास अचानक काम सुरु केल्यानंतर वाहनचालकांना कोणतेही पुर्वसूचना नसल्यामुळे मार्गावर वाहतूक सुरु होती. परंतु, या कामामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे वाहनचालकांसह प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागला. वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आले असून त्याचा वापर वाहनचालक यांनी करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

चुकीच्या नियोजनामुळे वाहतूक कोंड

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कल्याण टोल इन्फा. कंपनीतर्फे पुई येथील महीसदरा नदी पात्रावरील नवीन ब्रिजचे गर्डर बसविण्याचे काम दिले असून या गर्डर बसविण्याचे काम ठराविक ११ जुलै ते १३ जुले रोजी सकाळी ६ ते ८ व दुपारी २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान रोज करण्यात येणार असल्याची नियोजीत कामाचे वेळ ठरली होती. यावेळेत मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु, कामाची वेळ अचानक बदलल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन प्रवाश्यांचा तीन ते चार तास खोळंबा झाल्यामुळे प्रवाशी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!