मिलिंद माने
महाड : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे भव्य जिल्हास्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा चिपळूणमधील नारदखेरकी गावामध्ये आयोजित करण्यात आली होती. यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी स्पर्धेसाठी हजेरी लावली. या स्पर्धेचे आयोजन शेतकरी सेनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष उमेश लटके, चिपळूणचे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश घाग आणि मनसेचे चिपळूण जि. प. कलंबट गटाचे उप तालुकाध्यक्ष संतोष हातिस्कर यांच्या नियोजनामध्ये नारदखेरकी गाव यजमान आयोजक आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती.

या संपूर्ण चिखल नांगरणी स्पर्धत चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातुन जवळ जवळ 74 नामांकित बैल जोड्या, शेतकरी मालक, नामांकित जॅकी आपले गावठी व घाटी बैल जोड्या घेऊन स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत एक थरारक अनुभव किती सेकंदात अंतर पार पाडायचं ही कसब बैल जोडी पळवणारा नांगरणी करणारा जॅकी याची प्रतिष्ठा पणाला लावून विजयी होण्यासाठी प्रयत्न करीत होते. या स्पर्धेत एकूण घाटी गट आणि गावठी गट मिळून एकूण 1 लाख सात हजारचे रोख रक्कम बक्षीस आणि मानाचे चषक देऊन विजेत्या 14 बैल जोडी मालकांना व नांगरणी चालकाला बक्षीसे देऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गौरविण्यात आले. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय, शर्यत प्रेमी शेतकरी, महिला भगिनी, तरुण मंडळी यांनी या कार्यक्रम स्थळी येऊन पावसाळी अनोख्या स्पर्धेचा आनंद लुटला.
या स्पर्धेत विजेते म्हणून घाटी गटातून रत्नागिरी पाली येथील बैलजोडी संजय वामन सावंत यांच्या दोन्ही बैल जोडी यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते झाले. तिसऱ्या क्रमांकावर स्वराज्य स्वप्नील गुरव, चौथ्या क्रमांकावर संगमेश्वर तूरळमधील अर्णव सचिन हरेकर, पाचव्या क्रमांकावर शिंदे आंबेरे येथील संतोष सीताराम आलीम, सहाव्या क्रमांकावर चिपळूण शिरवली येथील भैरी चंडिका, सातव्या क्रमांकावर आरवली येथील स्वराज्य स्वप्नील गुरव या सर्व शेतकरी मालकांच्या घाटी बैल जोडीने पारितोषिक रक्कम आणि चषक घेऊन विजेते झालेत. या अनोख्या स्पर्धेत गावठी बैल जोडीमधून विजेते म्हणून प्रथम क्रमांक शिरवली भैरी चंडिका, द्वितीय क्रमांक मालघरमधील प्रकाश किळजे, तृतीय क्रमांक वाडावे सराडेमधील सुरेश परशुराम सोलकर, चौथा क्रमांक मालघरमधील गंगारामशेठ महाडिक, पाचवा क्रमांक संगमेश्वर तूरळमधील विग्नेश दिनेश हरेकर, सहावा क्रमांक शिंदे आंबेरे येथील कृष्णा काशीराम शिंदे, सातवा क्रमांक शिरवली भैरी चंडिका राजू लाड या सर्व मालकांच्या बैल जोडीनी या स्पर्धेत थरारक मैदान पार पाडुन विजेते म्हणून घोषित करण्यात आले. या सर्व बैल जोडींवर गुलाल उधळून आनंद व्यक्त केला आणि या विजेते बैल जोडी मालकांना मान्यववरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून मनसेचे नेते अविनाश जाधव, राज्य सरचिटणीस, कोकणचे नेते वैभव खेडेकर, गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हा अध्यक्ष विनोद जाणवळकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे, शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश लटके, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, नारदखेरकी चिपळूणचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस, दापोली तालुका अध्यक्ष केदार साठे, ग्रा. पं. सरपंच राघो गणपत आंबवकर, वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खेतले, मनसे चिपळूण तालुका सचिव संदेश साळवी, शेतकरी सेनेचे चिपळूण तालुका अध्यक्ष सुरेश घाग, खेडचे तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, गुहागरचे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, खेडचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानाडे, दापोली शहराध्यक्ष साई पुसाळकर, गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सतीशशेठ मोरे, विनोद भोबस्कर, भाजपचे रत्नागिरी चिटणीस गणेश हळदे, भाजप गुहागर कोषाध्यक्ष सौरभ चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे स्वीय सहाय्यक मोहन सावंत, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, सहकार सेनेचे ता. अध्यक्ष विनोद चिपळूणकर, जि. प. कलंबट गटाचे उप तालुका अध्यक्ष संतोष हातिस्कर, जि. प. कलंबटचे विभाग अध्यक्ष रमेश वेलोंडे, वेळनेश्वर जि. प. गट नितीन कारकर, शेतकरी सेना उप ता. अध्यक्ष निखील महाडिक, मनविसेचे उत्तर रत्नागिरीचे उपजिल्हा अध्यक्ष गुरुनाथ नागे, मनविसे चिपळूण ता. अध्यक्ष सागर कदम, सोहमजी पाथरे, दापोलीमधील पुसाळकर, ओमळी येथील ग्रा. पं. सदस्य सतीश कदम, या स्पर्धेचे खास समालोचन बहारदार आवाज असणारे मालघर येथील वैभव पवार, प्रदीप मोहिते, नारदखेरकी गावामधील आयोजक आणि नियोजन करणारे विलास दळवी, संदीप (पप्पू) हळदणकर, माजी सरपंच पांडुरंगजी बांद्रे, रविंद्रशेठ दळवी, विजय सि. झगडे (ग्रा. पं सदस्य), सुनील जाधव, प्रशांत मोहिते, सुधीर म्हस्के, रविंद्र खैर, रमेश गावडे, बेब्या हुमणे, अनिल सावंत, संतोष खांबे, दत्ताराम बांद्रे, अर्जुन बांद्रे, नारायण गांधी, चंद्रकांत जाधव, रघुनाथ चाळके, दीपक बांद्रे, दत्ताराम सावंत, जागा मालक प्रकाश झगडे, गोविंदशेठ बांद्रे, दाजीशेठ बांद्रे, मारुती बांद्रे (ग्रा.पं सदस्य ), संजय द. बांद्रे, हरिचंद्र झगडे, रुपेश दळवी, प्रसाद हळदणकर, ओमळी येथील गावकर शंकर कदम, मनसे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, उपविभाग अध्यक्ष आणि मनसैनिक नानू हातीस्कर, सुजल मयेकर, सुमित जाधव, बाळा रसाळ, गोपीनाथ कदम, संदेश मयेकर, गावातील सर्व मनसैनिक, सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळी, महिला भगिनी आणि शेतकरी प्रेमी, व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारदखेरकी गावातील सर्व ग्रामस्थ आणि मान्यवर व्यक्तींचे स्वागत करून, सर्वांचे आभार मानून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.