अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हीची निर्घृण हत्या करीत तिचा मृतदेह फेकून देणाऱ्या जिहादी दाऊद शेख याला तातडीने पकडुन फाशी देण्याच्या मागणीचे निवेदन अलिबाग मनसेने अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्यात आले आहे.
नवी मुंबईतील उरण तालुक्यातील उरण-पनवेल मार्गावरील एन. आय. हायस्कूलच्या समोर राहणारी 22 वर्षीय तरुणी यशश्री शिंदे हिची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. उरण शहरातील यशश्री शिंदे या तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येची माहिती (27 जुलै) पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना मिळाली होती. उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात स्थळी तिचे हात, अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. नवी मुंबई येथील परप्रांतीयांनी केलेले अक्षता म्हात्रे हिचे बलात्कार व निघृण खून प्रकरण ताजे असताना लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू युवतींना लक्ष करण्याचे गुन्हे वारंवार घडत असताना, त्याचे वारे आता आपल्या रायगड जिल्हयाच्या उंबरठ्यावर घोंघावू लागले आहेत.
यशश्री शिंदे ह्या हिंदू युवतीची निघृण हत्या नराधम दाऊद शेख यांने केली. या धर्मांध दाऊद शेखला अटक झाल्यानंतर त्याच्यावर तात्काळ योग्य व गंभीर कलमे लावून त्याला न्यायालायामार्फत लवकरात लवकर फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या पोलिस प्रशासनावर आहे. या सर्व घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून या लव्ह जिहाद प्रकरणांना आळा घातला पाहिजे, याची कृपया आपल्याकडून दखल घेण्यात यावी. तसेच आपला अलिबाग तालुका व रायगड जिल्हा यामध्ये अशा प्रवृत्तीचा समाज परप्रांतातून येवून राहत आहे का? याचा देखील योग्य तपास करून परप्रांतीय, बांगलादेशीय, रोहींग्या मुसलमान आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अलिबाग तालुकाध्यक्ष सिद्धू म्हात्रे, तालुका सचिव विनायक पालेकर, शहराध्यक्ष निजाम खान, माजी तालुकाध्यक्ष मुरलीधर वसंत पाटील, विद्यार्थी सेना अध्यक्ष महेश घरत, पर्यावरण सेना अध्यक्ष स्नेहल वर्तक, शुभम पाटील व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.