घनःश्याम कडू
उरण : उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे दळणवळणासाठी अनेक रस्ते व उड्डाणपूलाची निर्मिती होत आहे. त्यांना येथील थोर व्यक्तींची नांवे देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री व जेएनपीए प्रशासनाकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
उरण येथील करंजा येथून अलिबागला जोडण्यासाठी करंजा रेवस पुलाची उभारणी करण्याचे स्वप्न कोकणचे भाग्यविधाते समजले जाणारे माजी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे होते. आज ते हयात नाहीत परंतु त्यांचे स्वप्नपूर्ती लवकरच होणार असल्याने सदर करंजा रेवस पुलाला बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
त्याच बरोबर जेएनपीए बंदराच्यावतीने उरण ते पनवेल आणि उरण ते आम्रमार्ग या रस्त्यांचे आधुनिकीकरण करून सर्वोत्तम रस्ते तयार करण्यात आले आहेत. अतिशय नियोजनबद्ध आणि नीट नेटक्या रस्त्यांना अनेक ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आलेले आहेत . मात्र या उड्डाण पुलांना स्थानिक मान्यवर व्यक्तिमत्वांची नावे दिल्यास ते अतिशय समर्पक होईल . त्याचा बरोबर या भागातील ज्या महनीय व्यक्तींनी येथील विकासाला चालना दिलेली आहे त्यांचे नावाचे एक प्रकारे उचित स्मारक देखील होऊन जाईल याच पार्श्वभूमीवर उरण पनवेल मार्गावरील नवघर येथील उड्डाण पुलाला शेतकर्यांचे तारणहार तथा या भागात शिक्षणाची गंगा आणणारे आधुनिक भगीरथ तु. ह. वाजेकर शेठ यांचे तर गव्हाण फाटा उड्डाण पुलाला शेतकर्यांचे नेते जनार्दन भगत साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जेएनपीए च्या अध्यक्षांना दिलेल्या लेखी निवेदनातून करण्यात आली आहे .
उरण तालुक्याला भला मोठा असा इतिहास आहे. येथील चिरनेरचा जंगल सत्याग्रह स्वातंत्र्याच्या इतिहासात कोरला गेला आहे तर स्वातंत्र्यानंतर 1984 साली झालेला शेतकर्यांचा लढा देखील अतिशय शौर्यशाली आणि गौरवशाली झाला होता. या पार्श्वभूमीवर उरण, पनवेल तालुक्यात अनेक नामांकित व्यक्तींनी सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आपल्या जीवाची बाजी देखील लावलेली आहे. यामध्ये तू. ह. वाजेकर शेठ यांचे शिक्षणाचा प्रसार आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे उरणकरांच्या स्वाभिमानाची बाब आहे. उरण पेठा मिठागर कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्याबरोबरच कष्टकर्यांच्या योग्य त्या सन्मानासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच त्यांचे योग्य ते स्मारक या ठिकाणी निर्माण होण्याची गरज आहे. त्याकरिताच तुकाराम हरी वाजेकरशेठ यांचे कार्य अतिशय अजरामर असे आहे. त्यांचे योग्य ते स्मारक व्हावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या दृष्टीने नवघर या त्यांच्या जन्मगावाच्या परिसरात आपल्या बंदराच्या वतीने जो उड्डाण पूल बांधण्यात आला आहे, त्या पुलाला तुकाराम हरी वाजेकर यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी पत्रकार संघाने जेएनपीए अध्यक्षांना सुपूर्द केलेल्या पत्रातून केली आहे.
त्याचबरोबर स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांचे कार्य देखील गव्हाण शेलघर आदी परिसरात सर्वात मोठे आहे. त्यामुळे त्यांचाही योग्य तो सन्मान व्हावा या करिता गव्हाण फाटा या ठिकाणी आपल्या जेएनपीए बंदराच्या माध्यमातून जो उड्डाण पूल बांधण्यात आला आहे, त्याला स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जेएनपीएच्या अध्यक्षांना दिलेल्या लेखी निवेदनातून करण्यात आली आहे.
Nhava shivdi setu la suddha maharashtra madhlya kona thor purshacha nav daila phaije hota, D.B. patil hote Anutle shayab hote, vilasrao deshmuk, nahi tar churner satyaghra madhe sheid zalet tyancha navi Hutamata setu dila asta tari chla asta