किरण लाड
नागोठणे : येत्या काही तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्हयात वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यतेचा ईशारा भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या मुंबई शाखेने नाॅकास्ट चेतावणी दिली आहे. म्हणजेच याचा अर्थ वर्तमान हवामान मापदंडाचे 0 ते 2 तासाचे वर्णन दि. 15 जुलैच्या नाॅकास्ट चेतावणीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 3 ते 4 तास हलक्या सरीच्या स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाटसह तसेच विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तरी नागरीकांंनी बाहेर जातांना खबरदारी घ्यावी अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिली आहे.