वैभव कळस
म्हसळा : रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील बहुतांश प्राथमिक, माध्यमिक आणि अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करीत आहेत. तालुक्यातील रा. जि. प. शाळा ताडाचा कोंड आणि केलटे शाळेतही साहित्य वाटप करण्यात आले.
रा. जि. प. शाळा ताडाचा कोंड येथील मुंबईत वास्तव्य करीत असलेला एक तरुण अनिल काप याने शाळांची अवस्था पाहून खूप नाराजी व्यक्त केली. हे केवळ रायगड जिल्ह्यात विशेष करून पश्चिम रायगड मधील परिस्थिती अतिशय वाईट असल्याचे सांगितले. याला कारण आपल्या भागात असणारी बेरोजगारी. रोजगाराच साधन नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लोकांना कुटुंबासह स्थलांतराची वेळ आली आणी पर्यायाने शाळांतील पटसंख्या कमी होऊन शाळा बंद झाल्या. ही अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट असल्याचे अनिल काप यांनी सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना “शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे” ही संकल्पना पूर्णपणे लोप पावत चालली असल्याची भीती अनिल काप यांनी व्यक्त केली. लवकरच राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन शिक्षण शिक्षण विषयक समस्या मांडणार असल्याचे अनिल काप यांनी सांगितले.
रवी प्रभा मित्र मंडळाचे अध्यक्ष रवी लाड यांनी सांगितले कि, अनिल काप सारखा होतकरू तरुण जेव्हा जेव्हा हाक मारू त्यावेळी आमच्या मदतीसाठी धावतो. त्यामुळेच केवळ सामाजिक, शैक्षणिक आणी आरोग्य विषयक समस्या आम्ही संस्थेच्या माध्यमातून सोडवतो. यापुढेही ही चळवळ अशीच सुरु ठेवण्याचे आश्वासन त्यांनी प्रसंगी दिले. या प्रसंगी अध्यक्ष रविंद्र लाड, समाजसेवा प्रदिप कदम, अनिल काप, रामचंद्र कोबनाक, समीर लांजेकर, संतोष उद्धरकर, स्वप्नील लाड, सुशांत लाड, श्रेया धाडवे, स्वानंदी सावंत, किरण मोरे, किशोर गुलगुले, राजेश्री काप, किसन पदरत, भागवत काप, सृष्टी धाडवे, सरपंच शांताराम निंबरे, रामचंद्र मिसाळ, संतोष धाडवे, सावंत आणी रविप्रभा मित्र संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. राऊत सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत आणि आभार मानले.