रायगड जनोदय ऑनलाईन
लोखंडी कढईचा वापर नेहमीच स्वयंपाकासाठी केला जातो. आजच्या काळात विविध प्रकारची भांडी बाजारात आली असतील. पण पूर्वीच्या काळी लोक भाजी लोखंडी भांड्यातच शिजवायचे. याचे एक मोठे कारण म्हणजे लोखंडी कढईत शिजवलेले अन्न केवळ चवदारच नाही तर त्यात शिजवलेले अन्न आपल्या आरोग्यासाठी असंख्य आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. तुम्ही अनेकदा ऐकले असेल किंवा वाचले असेल की तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने तुमचे आरोग्य सुधारते, त्याचप्रमाणे लोखंडाच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्यानेही तुम्हाला फायदा होतो. आजही जर तुमच्या घरात लोखंडी कढईत भाजी शिजत असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या शिजवणे योग्य नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या लोखंडी कढईत शिजवल्या तर त्यांची चवच खराब होत नाही तर त्या विषारी बनतात आणि तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकतात.
लोखंडी कढईतील पदार्थ खाल्ल्याने होणारे परिणाम-
तज्ज्ञांच्या मते, लोखंडाच्या भांड्यात तयार केलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढू शकते. यामुळे तुम्हाला आजार होण्याचा धोका वाढू शकतो किंवा तुम्हाला अतिसार, रक्तस्त्राव आणि मळमळ यासारखी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय लोखंडाच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने तुम्हाला हेमोक्रोमॅटोसिस नावाचा आजार होण्याचा धोका असतो. यामुळे तुमच्या यकृत, हृदय आणि स्वादुपिंडात अतिरिक्त लोह जमा होते. ज्यामुळे तुम्हाला यकृताचे आजार, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका होऊ शकतो.
‘हे’ पदार्थ लोखंडी कढईत अजिबात बनवू नये-
मासे-
बहुतांश लोक लोखंडी कढई किंवा लोखंडी भांड्यात मासे आणि इतर सीफूड शिजवतात. परंतु तज्ज्ञांनी सुचवले आहे की, लोखंडी कढईत मासे शिजवणे किंवा तळणे टाळणे चांगले कारण मासे पॅनच्या तळाशी चिकटू शकतात आणि त्यामुळे अतिरिक्त लोह माशामध्ये शोषला जाऊन रासायनिक प्रक्रिया होऊन आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
अंडी-
लोखंडी कढईमध्ये अंडी न शिजवण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण लोह अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये असलेल्या सल्फरवर प्रतिक्रिया देऊ शकते. ज्यामुळे ते तपकिरी होतात आणि त्यांची चव खराब होते. या प्रतिक्रियेमुळे लोखंडाचा रंग खराब होऊ शकतो आणि गंज येऊ शकतो, जे काढणे कठीण होऊ शकते.
लिंबू असलेले पदार्थ-
जेव्हा तुम्ही लोखंडी कढईत अन्न शिजवता तेव्हा चुकूनही लिंबू वापरू नका. बरेचदा लोक काहीही शिजवताना लिंबाचा रस घालतात. ज्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. वास्तविक, लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड आढळते. जे लोहावर प्रतिक्रिया देते आणि केवळ अन्नाची चवच नाही तर आरोग्यदेखील बिघडू शकते.
पालक-
पालकाची भाजी लोखंडी कढईत बनवणे टाळावे. कारण पालकामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड असते. जे लोहावर प्रतिक्रिया देते आणि पालकाचा रंग खराब करू शकते. याशिवाय असे अन्न आरोग्यासाठीही हानिकारक आहे.
टोमॅटो-
टोमॅटोमध्ये टार्टेरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे ते लोखंडी कढईमध्ये शिजवण्याने मऊ होऊ शकतात. असे केल्याने भाजीत धातूची चव येऊ शकते.शिवाय त्याने आरोग्य बिघडू शकते.
(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)