पेण, अलिबाग, पनवेलची जागा शेकापला सोडणार
मुंबई : लोकसभेत आम्हाला मित्रपक्षांनी साथ दिल्याने विधानसभेसाठी त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेकाप नेते जयंत पाटील यांची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाल्यानंतर शेकापसाठी अलिबाग, पेण आणि पनवेल हे तीन मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. सोमवारी (ता. 04 नोव्हेंबर) खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मविआतील बंडखोरीबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यावेळी त्यांनी मविआतील मित्रपक्षांसाठी प्रमुख तिन्ही पक्षांनी जागा सोडल्या असल्याची माहिती दिली आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)