• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्रात ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान; वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार?

ByEditor

Nov 21, 2024

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता निकालाची प्रतीक्षा आहे. यावेळी राज्यातील मतदारांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यात १९९५ नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदान झाले आहे. बुधवारी मतदानाचा टक्का ६५ टक्क्यांच्या पुढे गेला होता. आता महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन प्रमुख आघाडीचे पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत.

काल (२० नोव्हेंबर) रात्री ११.४५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ६५.१ टक्के मतदान झाले होते. यापूर्वी १९९५ मध्ये राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीचा विक्रमही या मतदानात मोडला गेला आहे. यांच्याच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ६१.३९ टक्के मतदान झाले होते. तर, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. राज्यातील प्रचंड मतदानाचे कारण महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीला ४२.१ टक्के तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली होती. सत्ताधारी महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर, महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी, सपा आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!