• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

ByEditor

Nov 25, 2024

25 ते 30 फूट खोल नदीत कार कोसळली, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

सलीम शेख
माणगाव :
मुंबई गोवा महामार्गावर मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत संध्याकाळी ५ वा. च्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून पुलाचा कठडा तोडून सुमारे 25 ते 30 फूट खोल नदीत खाली कोसळून झालेल्या अपघातात एक महिला व पुरुष जागीच ठार झाल्याची घटना व्हावी दिवाळी गावच्या हद्दीत घडली. हा अपघात एवढा भयंकर होता की भरधाव येणारी कर नदीवरील पुलाच्या कठड्याला ठोकून हा कटडा तुटून जोरदार पुलात आढळली. त्यावेळी गाडीच्या अपघाताने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चक्काचुर झाला आहे.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी ब्रिजच्या खाली कोसळली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर तीन कि.मी अंतरावर मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत २५ नोव्हेंबर संध्याकाळी ५ वा. च्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी एम एच १६ बी एच ४८२९ वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चकाचुर झाला आहे. या गाडीमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. देवयानी दशरथ दुदुमकर व दशरथ दुदुमकर अशी मयत झालेल्यांची नावे असून ते अँटॉप हिल मुंबई येथील राहणारे असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. ग्रामस्थ व क्रेनच्या सहाय्याने गाडीला वरती काढण्यात आले आहे. जखमी कार चालकाला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!