• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, दरे गावात जाऊन काय बसले…’; राजू पाटील यांचे मोठे विधान

ByEditor

Dec 2, 2024

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यामध्ये आपल्या गावी गेल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. दिल्लीवरून माघारी परतलेल्या शिंदेंना ताप आल्याने ते विश्रांती घेत होते. आता रविवारी परत एकदा ठाण्यामध्ये परतले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आता सत्तास्थापनेच्या बैठकींना वेग येणार असल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सुरूवातीला बोललं गेलं होतं. पण अजूनही मुख्यमंत्री कोण असणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशातच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी यावर भाष्य करताना मोठे विधान केले आहे.

ईव्हीएमच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या काय राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले. शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे. ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय येतोय, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. जो निकाल लागला त्याचा मी स्वीकार केलाय. राज्यात ज्या गोष्टी घडतायत, ईव्हीएम बद्दल बोंबाबोंब चालू आहे, मनसेने २०१८ मध्ये ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू केली होती . यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक लोक मला भेटतात तुम्हालाच भरभरून मतदान केलं, मात्र ते दिसत नाही असं सांगत असल्याचं राजू पाटील म्हणाले.

वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे. एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरल्याचं मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघात ६५ हजार मतदान वाढलं. कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण ६५ हजार मतदान वाढले आणि ६६ हजार मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झालेत. २०१९ साली मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे जिंकले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!