कोल्हापूर : सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज कागल तालुक्यातील चिमगांव मध्ये समोर घडली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगांव येथे हा प्रकार घडला. रणजित नेताजी आंगज यांचा मुलगा श्रेयस (वय ४) आणि मुलगी काव्या (वय ७) अशा दोघा सख्ख्या बहीण-भावाचा पेस्ट्री केक खाल्ल्यावर जूलाब उलट्या झाल्या त्यातच उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.