• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भरत गोगवलेंचा पत्ता कट, अदिती तटकरेंनी राय’गड’ राखला!

ByEditor

Jan 18, 2025

प्रतिनिधी
रायगड :
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत संघर्ष निर्माण झाला होता. आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी मोर्चेबांधणी केली होती. भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद दिले जावे यासाठी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनाही विश्वासात घेण्यात आले होते. मात्र आज पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पुन्हा अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. आता जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता. राष्ट्रवादीच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यात थेट स्पर्धा होती. भरतशेठ यांनी अनेकदा पालकमंत्रिपदावर दावा ठोकला होता. मात्र अखेर आदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असणार आहेत. भरतशेठ गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. भरतशेठ गोगावले यांनी एकदा पालकमंत्रिपदावरुन बोलताना अजब वक्तव्य केलं होतं. “आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं तरी मी त्यांच्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही?” असं अजब वक्तव्य गोगावले यांनी केलं होतं. यावरुन चांगलाच वादही रंगला होता.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!