• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

ByEditor

Jul 28, 2023

किरण लाड
नागोठणे :
रायगड जिल्ह्यामध्ये‌ अतिवृष्टी होत असून भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसुचनेनुसार रायगड जिल्ह्याला २७ ते २९ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या सर्व बाबीचा विचार करता रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये आज दि. २८ जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभर मुसळदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील नद्यांना पूर आलेला होता. ठिकठिकाणी दरडी कोसळून जीवित तसेच वित्तहानी झाली होती. बससेवा,वाहतुक व्यवस्था कोलमडून जनजीवन विस्कळीत झालेले होते. दि. २८ जूलै रोजी पावसाच्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर गावातुन, वाड्यांतुन, डोंगरातुन शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक वर्गांचे हाल होऊ नये, त्यांना येणाऱ्या नैसर्गिक सकंटाची आगाऊ सुचना मिळण्यासाठी, तसेच संभाव्य पुढील धोक्यापासून सावध राहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, व महाविद्यालये आज दि. २८ जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन, रायगड डॉ. योगेश म्हसे यांनी शासन निर्देशानुसार घेतला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!