• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तटकरेंनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा दावा सोडला? काय म्हणाले तटकरे…

ByEditor

Jan 30, 2025

रायगड : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आदिती तटकरे यांची पुन्हा नियुक्ती केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी चांगलेच आक्रमक झाले. मागे तर त्यांनी जिल्ह्यात आंदोलन करत आदिती तटकरे यांना हटवून मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री करा, अशी थेट मागणी केली. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाल्याने राज्य सरकारने देखील रायगड तसेच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता शिवसेना शिंदे गट विरूद्ध तटकरे असा राजकीय सामना रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे. यातच या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांना विचारले असता त्यांनी यावर मोठे भाष्य केलंय.

पालकमंत्री पदावरून सुरुवातीपासून महेंद्र दळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला आव्हान देत जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय प्रलंबित ठेवला. यातच सध्या महेंद्र दळवी , सुनील तटकरे तसेच आदिती तटकरे यांच्यावर उघड उघड भूमिका घेताना दिसत आहे. भरत गोगावले यांनी देखील सुनील तटकरे यांना थेट जिल्ह्यात फिरून देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहत राहिलय.

पालकमंत्री पदाबाबत तसेच बीड प्रकरण त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुका संदर्भात काल राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत या संपूर्ण विषयावर आढावा घेत यातून काय मार्ग काढता येईल? यावर चर्चा झाली. यानंतर सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच त्यांना पालकमंत्री पदाचा प्रश्न विचारले असता त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा विषय माझ्यासाठी संपला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तटकरे यांच्या बोलण्यावर राष्ट्रवादी अजित वर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री पद सोडणार का ? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!