• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

केलेल्या विकासकामांची थकीत बिले मिळाली नसल्याने कर्जतमधील ठेकेदार संघटनेचे ५ फेब्रुवारीपासुन काम बंद

ByEditor

Feb 7, 2025

१५० कोटी रूपयांची बिले थकली, अधिक्षक अभियंता कोकण भवन यांना निवेदन

कर्जत तालुक्यात विकासकामांना बसणार खीळ?

गणेश पवार
कर्जत :
तालुक्यात शासनाच्या माध्यमातून गेले दीड दोन वर्षात ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांची बिले ही ठेकेदारांना अद्याप मिळाली नसल्याने कर्जतमधील ठेकेदार संघटनेकडून ५ फेबुवारीपासुन विकास कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असुन, या संदर्भात कर्जत ठेकेदार संघटनेच्या माध्यमातून अधिक्षक अभियंता कोकण भवन यांच्यासह इतर सार्वजनिक विभागांच्या अभियंताना निवेदन देण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यात कोट्यवधी रूपयांची विकास कामे शासन स्तरावरून मंजूर करण्यात आली होती. सदर मंजूर विकास कामे ही कर्जतमधील ठेकेदारांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहेत. परंतू सदर विकासकामांची कर्जत तालुक्यातील ठेकेदारांची सुमारे १५० कोटी रूपयांची बिले ही थकीत आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ठेकेदारांपुढे कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचा प्रश्न कर्जत तालुक्यातील ठेकेदार संघटनेकडून उपस्थित करत, गेली दीड दोन वर्षात आम्हाला जो निधि उपलब्ध झाला पाहिजे तो निधी हा उपलब्ध झाला नसल्याने कर्जत तालुक्यातील सर्व ठेकेदारांनी नाईलाजात्सव विकास कामे बंद आंदोलन पुकारत कर्जत ठेकेदार संघटनेमार्फत ५ फेबुवारीपासुन विकास कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असुन, या संदर्भात कर्जत ठेकेदार संघटनेच्या माध्यमातून अधिक्षक अभियंता कोकण भवन, कार्यकारी अभियंता पनवेल, उपअभियंता कर्जत यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देते प्रसंगी कर्जत ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर, सचिव उदय पाटील, संभाजी जगताप, भगवान चव्हाण, सूर्यकांत चंचे, अनंता नीलधे, शरद बडेकर, उमेश म्हसे, प्रमोद खडे, जब्बर शेख, इरवश्वर गायकवाड, सुभाष सावंत हे ठेकेदार उपस्थित होते. सदर आंदोलनामुळे कर्जत तालुक्यात विकास कामांना खिळ बरणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!