नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरु केली असल्याचं समजतंय. भाजपच्या विविध बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात येत आहे. यावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अशातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक व केलं आहे. आम्ही स्वत: बळावर लढायला तयार आहोत, असं शिरसाट म्हणाले.
काही नेते उगाच आपलं मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काय सांगायचं आहे, ते आपल्या नेत्यांना सांगा. आमची महायुती म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर, आम्हाला मान्य असेल, असं शिरसाट म्हणाले. आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नका. महायुतीसोबत लढायचं तर, हो म्हणा, नसेल तर आम्ही स्वत: स्वबळावर लढायला तयार आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वबळाचा नारा देणार हे लवकरच स्पष्ट होईल.
‘धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर नसल्याचं धस म्हणाले. पण धस तिथे का गेले, तिथे त्यांच्यात काय चर्चा झाली. याबाबत कुणालाच काहीच माहिती नाही. हे राजकीय भांडवल नाही. कुणाचा तरी जीव गेला आहे. यासाठी जी काही कारवाई सुरु आहे, त्याला अनुसरुन सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. सुरेश धस यांनी देखील केलं आहे. त्या प्रकरणाचा आणि या भेटीचा काहीही संबंध नाही’. संतोष देशमुख हत्या करणाऱ्याचा तपास सुरु असल्याचं शिरसाट म्हणाले.