• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण, जेएनपीए बंदराकडे जाणाऱ्या उड्डाण पूलाला तडे

ByEditor

Feb 22, 2025

खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेश बालदी यांनी लक्ष देण्याची गरज

अनंत नारंगीकर
उरण :
उरण, जेएनपीए बंदर – नवीमुंबई, पनवेल महामार्गावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या करळ रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाण पुलाच्या भिंतीला तडा गेला आहे.त्यामुळे सदर पुलाच्या बांधकामाबाबत शंका घ्यायला वाव आहे.भविष्यात घात – अपघात झाल्यास त्याचा फटका प्रवाशी वाहनांबरोबर नागरीकांना बसेल.तरी या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे व उरणचे आमदार महेश बालदी यांनी अशा पुलाची प्रत्यक्ष पाहणी करुन दुरुस्तीबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

उरण तालुक्याचा औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने विकास होत असल्याने या परिसरातील वाहनांची रेलचेल ही सुरक्षित व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या देखरेखीखाली जेएनपीए बंदर, सिडको व्यवस्थापनाने नँशनल हवे अँथरिटी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून अनेक उड्डाण पूलाची कामे केली आहेत.परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे फुंडे,जासई ग्रामपंचायत हद्दीतील पुल,पुलाचा गर्डर ( खांब ) पडून मोटारसायकल स्वार तसेच कामगारांना आपले प्राण गमवावे लागले होते.तसेच चिर्ले- धुतूम खाडीकिनाऱ्यावरील पुल पडून मासेमारीसाठी गेलेले ४ आदिवासी बांधवांना जीव गमवावे लागले होते. पागोटे ग्रामपंचायत हद्दीतील उड्डाण पूलाचे बांधकाम, रस्ता खचल्याची ही घटना समोर आली यावेळी पोलीसांच्या सतर्कतेमुळे रात्रीच्या अंधारात होणारी मोठी दुर्घटना टळली होती. त्यामुळे भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यातील पुलाची ही हालत असेल तर काम पूर्ण झाल्यावर नव्याने उभारण्यात येत असलेलं उड्डाणपुल खरेच धोकाविरहित ठरतील का, असा प्रश्नही उरण सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

मात्र जेएनपीए बंदर, सिडको, नँशनल हवे अँथरिटी सार्वजनिक बांधकाम विभाग व्यवस्थापनाच्या भ्रष्ट कारभारामुळे तसेच लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षित पणामुळे आजही तालुक्यातील अनेक उड्डाण पुलाची अवस्था ही अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे धोकादायक आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्वच पुलांचे ट्रक्चर अडिड करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.परंतु संबंधित अधिकारी वर्गाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने करळ रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या उड्डाण पूलाच्या बांधकामांना तडे गेल्याची बाब समोर येत आहे.त्यामुळे सदर पुलाच्या बांधकामाबाबत शंका घ्यायला वाव आहे.भविष्यात घात – अपघात झाल्यास त्याचा फटका प्रवाशी वाहनांबरोबर नागरीकांना बसेल.तरी या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे व उरणचे आमदार महेश बालदी यांनी अशा पुलाची प्रत्यक्ष पाहणी करुन दुरुस्तीबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत तसेच तालुक्यातील इतर सर्व पुलांचे ट्रक्चर अडिड करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!