अनेक वर्षापासुन होणाऱ्या पुराच्या पाण्याच्या त्रासापासुन वाहनचालकांची होणार सुटका
गणेश पवार
कर्जत : उल्हास नदीवरील नेरळ-कळंब या मुख्य रस्त्यावरील दहिवली-मालेगाव येथील मंजूर नविन पुलाच्या कामाचा पावसाळ्यापूर्वी शुभारंभ झाला होता. तर आता या नविन पुलाच्या बांधकाम कामाला सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांच्याकडून सुरुवात करण्यात आली आहे. या पुलाच्या कामाकरीता तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २२ कोटींचा निधी मंजूर केला होता.
नेरळ-कळंब या मुख्य रस्त्यावर दहिवली-मालेगाव येथील उल्हास नदीवर पुलाचे बांधकाम हे सन १९७५ च्या काळात करण्यात आले होते. साधारण या पुलाच्या बांधकामाला ५० वर्ष झाली असून सदर पुलाची ऊंची ही कमी पडत असल्याने पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी जात असल्याने, या पुलाचे बांधकाम देखील निकामी झाले होते व पुलाला धोका निर्माण झाल्याचे चित्र समोर येत असल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या पुलाचे तातडीने स्ट्रक्चर ऑडिट करण्यासे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.

नेरळ-कळंब या रस्त्यावरू वाहतूक करणाऱ्या नागरिकांना पुराच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या समस्येबाबत काही नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाचे संर्पकप्रमुख किरण ठाकरे यांच्याशी संर्पक साधुन समस्या मांडल्या होत्या. त्यानुसार किरण ठाकरे यांनी नागरिकांच्या समस्या व या ठिकाणी नविन पुलाच्या बांधकामा संदर्भात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडल्या असता, नविन पुलाच्या बांधकामासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यावेळी २५ कोटीचा निधी मंजूर करून दिला होता. त्यानुसार या पुलाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २५ कोटीच्या अंदाजपत्रकासह मंजुरी देण्यात आली.
पावसाळ्यापूर्वी मे २०२४ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र पावसाळा सुरु झाल्यामुळे या पुलाचे काम हे सहा महिने बंद पडले होते. आता काही दिवसांपासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या नविन पुलाच्या कामाला सुरवात करण्यात आली असल्याने, पुढे या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मात्र जो पूराच्या पाण्याचा त्रास वाहनचालक नागरिकांना होत होता तो भविष्यात दूर होणार होणार आहे.
या पुलाचे बांधकाम हे पुणे येथील ठेकेदार कंपनीला दिले असुन, त्या ठकेदार कंपनीकडून हे काम वेगाने करण्यात येणार असून मे २०२५ पूर्वी या पुलाचे सर्व १४ पिलर उभे करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.
-संजीव वानखेडे,
उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत.