घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील करंजा गावातील समुद्रकिनारी डागडुजीसाठी मासेमारी बोटी उभ्या आहेत. काल व आज डागडुजी सुरू असलेल्या दोन मासेमारी बोटींना आग लागण्याची घटना घडली.

आज दुपारच्या वेळेत वेल्डिंगचे काम सुरू असताना बोटीतील काही भागाला आग लागण्याची घटना घडली. त्वरित घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल होऊन जवानांनी आग विझवली, अन्यथा आगीचा भडका उडून आजूबाजूच्या उभ्या असलेल्या बोटींना आग लागण्याची शक्यता होती. दोन दिवसांत दोन बोटींना आगी लागण्याची घटना घडल्याने मालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.