• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वणव्यामुळे लागलेल्या आगीत सहा दुचाकी जळून खाक

ByEditor

Mar 29, 2025

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेरील घटना

कर्जत : तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून उपनगरीय लोकल प्रवास करणारे प्रवासी यांनी पार्किंग केलेल्या सहा दुचाकी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. परिसरात गवताला वणवा लागल्याने भर दुपारी उभ्या असलेल्या सहा दुचाकी आगीत जळून भस्मसात झाल्या.

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी हे आपल्या दुचाकी स्थानकाच्या बाहेर पार्किंग करून ठेवतात. गेली अनेक वर्ष त्या गाड्या तेथे पार्किंग करून हे प्रवासी नोकरीच्या ठिकाणी जातात आणि नंतर सायंकाळी रात्री भिवपुरी रोड येथे परत आल्यावर दुचाकी घेऊन घरी परतत असतात. बार्डी गावातील तुषार मोहन कांबरी, चांदई येथील शिवसृष्टी तसेच रीवा रिदम या सोसायटीमधील रहिवाशी यांच्या त्या दुचाकी होत्या. शनिवारी (दि. 29) सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकी नेहमीच्या ठिकाणी पार्किंग करून ते प्रवासी आपल्या नोकरीच्या ठिकाणी गेले होते. मात्र, दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुचाकी पार्किंग केलेल्या ठिकाणी असलेल्या गवताला आग लागली. गवत सुकलेले असल्याने आग अधिक भडकली आणि त्यामुळे त्या आगीचे लोळ दुचाकीपर्यंत पोहोचून गाड्यांना आग लागली. या आगीत सहा गाड्या आगीत जळून खाक झाल्या.

आग लागल्याचे पाहताच भिवपुरी रोड स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत सहा दुचाकी जळून खाक झाल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!