राजेश बाष्टे
अलिबाग : पेझारी नागोठणे रस्त्याचे दुरूस्तीचे काम गेल्याच वर्षी करण्यात आले परंतु, हे काम करताना अनेक त्रृटी राहिल्या आहेत त्यामुळे सदर ठिकाणं हि अपघाती ठिकाण म्हणून नोंदली जातील.
या ठिकाणांपैकी या मार्गावरील श्रीगाव नदीवर दुरूस्त केलेला कठडा हा फक्त नदीच्या पात्रापुरताच आहे कठड्यापासुन कोणत्याही प्रकारचा भराव करून साईडपट्टी काढली नाही व कठड्यापासुन कमीतकमी १५ फुटांपर्यंत संरक्षक कठडे बांधणे आवश्यक असताना देखील ते कठडे बांधले नसल्यामुळे एखादे वाहन चुकून बाजुला ऊभे करण्याठी नेले अथवा एखाद्या गाडीवरील नियंत्रण थोडे जरी चुकले तर ती गाडी थेट नदीपात्रात जाईल व मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नदीपात्र हे रस्त्यापासुन जवळपास ४० फुट खोल असुन रस्त्याला या ठिकाणी मोठे वळण आहे. या सर्व बाबींचा विचार करता येथे संरक्षण कठडे तातडीने बांधण्याची मागणी मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णु पाटील यांनी या रस्त्याचे जबाबदार अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग पेणचे डी. एम. पाटील यांची भेट घेऊन केली. यावेळी पाटील यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कठडे बांधण्याचे आश्वासन देवव्रत पाटील यांना दिले.