• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बांगलादेशी घुसखोरांना घेऊन जाताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, 3 PSI, 15 हवालदार जखमी

ByEditor

Jun 18, 2025

प्रतिनिधी
पनवेल :
मुंबई पुणे महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बुधवार (18 जून) सकाळी सुमारे 8.15 वाजता नवी मुंबई कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भाताळा बोगद्यानजीक मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा साखळी अपघात झाला.

मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई पोलीस युनिट्सचा समावेश असलेला हा ताफा मुंबईतील फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसद्वारे कैद्यांच्या प्रत्यार्पणासाठी निघाला होता.

हा अपघात सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात मुंबईच्या प्रोटेक्शन ब्रँचमधील विजय माने यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सुमारे १२ बांगलादेशी निर्वासितांना किरकोळ दुखापती झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले.

सर्व जखमींना तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातस्थळी आपत्कालीन पथकांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि नुकसानग्रस्त वाहने बाजूला करून बोगद्यातील वाहतूक पुन्हा सुरळीत केली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी दिली.

या अपघातानंतरही, उर्वरित ताफा आणि अधिकारी नियोजित प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढे रवाना झाले आहेत. १६० निर्वासितांपैकी २२ मीरा-भाईंदर, वसई विरार येथील आहेत, ४० मुंबई शहरातून, ७५ नवी मुंबईतून आणि २३ ठाणे शहरातून आहेत. अधिकाऱ्यांनी अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!