अभय पाटील
बोर्लीपंचतन : बोर्लीपंचतन परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनंतर अखेर बोर्लीपंचतनहून बोरीवलीकडे जाणाऱ्या नव्या एस.टी. बससेवेचा आज (२० जून २०२५) दिमाखात शुभारंभ झाला. यावेळी परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन व श्रीफळ वाढवून प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या.
श्रीवर्धन आगारप्रमुख महेबूब मणेर यांच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून विजय कांबळे यांच्या माध्यमातून बससेवेची सातत्याने मागणी करण्यात येत होती. मात्र गाड्यांचा तुटवडा असल्याने ही सेवा सुरु होण्यात अडथळा येत होता. अखेर आजपासून ही सेवा सुरू करण्यात आल्याने प्रवाशांत समाधानाचे वातावरण आहे.
पूर्वी बोरीवलीसाठी फक्त एकदाच दुपारी १२ वाजता गाडी उपलब्ध होती. परंतु उपनगरात श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाल्याने ही एकमेव सेवा अपुरी पडत होती. नवी गाडी सुरू झाल्याने आता प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत.
बस वेळा:
बोर्लीपंचतन – दुपारी १.३० वाजता प्रस्थान
बोरीवली – पहाटे ४.४५ वाजता प्रस्थान
या प्रसंगी श्रीवर्धन स्थानक प्रमुख शर्वरी लांजेकर , बोर्लीपंचतनच्या माजी सरपंच जोती परकर, अखंड आगरी समाज अध्यक्ष वैभव पाटील, कापोलीचे माजी अध्यक्ष परशुराम पाटील, माजी उपसरपंच प्रकाश तोंडलेकर,प्रदिप हेदुकर, ट्राफिक हवालदार सुरज शेडगे, राजू नांदविडकर, निशांत मोरे, ॠणाल सातनाक, उमेश मोहिते, अमित दिवेकर, ओंकार कोदेरे, मंगेश पाटील, भाई शिलधनकर, बोर्लीपंचतन स्थानक प्रमुख प्रसाद मोरे, प्रदिप शिंदे व अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून चालक-वाहकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने प्रवाशांना नव्या सेवेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.