घनःश्याम कडू
उरण : उरण मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास महागला असून त्यासाठी आता 105 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रवास महागला परंतु प्रवाशांची सुरक्षा वार्यावर असून याकडे लक्ष देण्यास प्रशासनासला वेळ नसल्याचे प्रवासी वर्ग सांगतात. मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
पावसाळी हंगामासाठी दरवाढ केल्याने सागरी प्रवास दरवर्षी प्रमाणे महागणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात वाढ केली जाते. मागील वर्षीही तिकिट दरात वाढ करण्यात आली होती. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकिट दरात 80 रुपयांंवरुन 25 रुपये वाढ करीत ती 105 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हाफ तिकिट दरातही 39 रुपयांवरुन 53 रुपयांपर्यंत म्हणजे नऊ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 26 मेपासूनच 31 ऑगस्ट पर्यंत लागु राहणार असल्याची माहिती मोरा बंदर निरिक्षक प्रकाश कांदळकर यांनी दिली.
दरवर्षी मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात पावसाळी हंगामाचे कारण पुढे करत प्रत्येक पावसाळी हंगामात 20 ते 25 रुपयांपर्यंत वाढ केली जाते. त्यानंतर वाढ करण्यात आलेली तिकीट दरवाढ उन्हाळी हंगामातही कायम ठेवली जाते. त्यानंतर पावसाळी हंगामात पुन्हा तिकिट दरवाढ केली जाते. पावसाळी तिकीट दरात वाढ केली जाते. परंतु या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांची सुरक्षा मात्र वार्यावर असल्याचे बोलले जात आहे. बोटींची अवस्था बिकट असून स्वच्छतेचा अभाव जाणवत आहे. जलवाहतूक करणार्या बोटींची मुदत किती आहे, तसेच याबाबत बोट मालकांनी कोणकोणती सुरक्षा घ्यावी किंवा इतर कोणतेही सूचना फलक नसते. धक्क्यावर अस्वच्छता व प्रवाशाना येजा करण्यास वाट नसणे. बोटींचे ऑडिट वेळच्या वेळी होत नसल्याचे दिसत आहे. तरी याची चौकशी करण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.