नवतरुण मित्रमंडळ वाघळी यांनी घेतला पुढाकार
किरण लाड
नागोठणे : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा नुकताच किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न झाला. 2 जुन ते 6 जुन दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातुन व देशभरातून जवळपास तीन लाख शिवभक्त महाराजांना अभिवादन करण्यासाठी, समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी किल्ले रायगडावर जमले होते. मोठ्या प्रमाणात शिवभक्त गडावर आल्याने या पाच दिवसात लाखो टन कचरा गडावर पडला होता.
गडांच्या राजाच्या स्वच्छतेची जबाबदारी घेत गड संवर्धन करण्यासाठी नवतरुण मित्रमंडळ वाघळी, नागोठणे यांच्यावतीने दि. 7 जुन रोजी किल्ले रायगडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये महेश किर्दत, राहुल कदम, विजय कदम, विनायक कदम, अजय साळुंखे, रुपेश कदम, रोशन कदम, लखन किर्दत, निलेश किर्दत, रुपेश साळुंखे, अक्षय कदम, सुमित कदम, सुजल कदम, विघ्नेश कदम, पीयूष कदम, ओम कदम, रुद्र कदम, विशाखा कदम, वैष्णवी कदम, वेदिका कदम, चैताली कदम, धनश्री कदम, माधुरी कदम, तुलशी कदम, प्रणाली शिंदे, संचीता कदम आदी शिवभक्तांनी सहभाग घेऊन हजारो टन कचरा गोळा करुन गडावर स्वच्छता मोहिम यशस्वीपणे राबविली व श्री छत्रपती शिवजी महाराजांना अभिप्रेत असे गड संवर्धनाचे व स्वच्छतेचे सामाजिक कार्य केले आहे. आपल्या या अनोख्या मोहिमेतून नवतरुण मित्रमंडळ वाघळी यांनी महाराजांना अभिवादन केले.