• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आराठी गावातील कचरा समस्या कधी सुटणार?

ByEditor

Jan 6, 2024

स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे ग्रामपंचायत समोर आव्हान

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्याच्या प्रवेशद्वारात वसलेले आराठी हे महत्वाचे गाव आहे. कारण श्रीवर्धन शहरात जाताना याच गावातून जावे लागते. असे असताना येथे सर्वत्र प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. नवीन वर्षात देखील जुनाच संकल्प असल्याने या परिसराचे विद्रुपीकरण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

श्रीवर्धन शहरालगत आराठी ग्रामपंचायत हद्द असून येथील कचरा समस्या अद्याप सुटली नाही. नव्याने होत असलेल्या इमारतींचे जाळे, त्यात लोकवस्ती आणि वाढती दुकाने यांना कचरा विल्हेवाटसाठी मार्ग उपलब्ध नसल्याने कचऱ्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. यावर ग्रामपंचायतकडून देखील ठोस उपाय योजना होत नसल्याने संपूर्ण गावाला कचऱ्याचा विळखा बसला आहे.

गावाचा विस्तार मोठा आहे, मात्र ग्रामपंचायतीतर्फे विविध ठिकाणी कचराकुंड्यांची व्यवस्था न केल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावरच फेकून देत असल्याचे दिसते. हा कचरा वेळेत न उचलल्याने परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दृष्य दिसून येते. रस्त्यालगत कचरा टाकल्याने तेथे अस्वच्छता निर्माण झाली आहे. साठलेला कचरा वेळच्या वेळी उचलावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बऱ्याच दिवसांपर्यंत कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे घाणीची दुर्गंधी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

स्वच्छतेसाठी महाराराष्ट्रासह देशात सर्वत्र स्वच्छता अभियान आज राबविण्यात येतात. मात्र, स्थानिक संबधीत विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातुन ही कचर्याचे ढिग दिसून येत आहेत. या मार्गावर गोखले महाविद्यालय असून रस्त्याचा वापर शाळेतील मुले, स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून सातत्याने होत आहे . मात्र, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुटीत घेवून याच रस्त्यानी ये-जा करावी लागत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!