• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण सामाजिक संस्थेने आदिवासी महिलेस मिळवून दिला न्याय

ByEditor

Jun 22, 2023

आजोबांची हडप केलेली पाच एकर जमीन परत मिळणार
कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांची विशेष मदत

घन:श्याम कडू
उरण :
मौजे दिघोडे तालुका उरण येथील सर्व्हे नंबर 94/8 व 100/1 ही जमीन मिळकत सन 1961 मध्ये कुळ कायद्या अन्वये गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या नावे होती. सन 1980 मध्ये त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे तीन मुलगे पोशा, पांडुरंग, लक्ष्मण यांची नावे वारसा हक्काने लागणे गरजेचे होते. परंतु तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमत करून गोपाळ लहाण्या कातकरी यांचे वारस म्हणून आगरी समाजाचे 1) तुळशीराम बाबू घरत, 2) लहू बाबू घरत, 3) अंकुश बाबू घरत, 4) भरत बाबू घरत यांची नावे अवैधरीत्या सात बारा सदरी दाखल केली. सन 1996 मध्ये ही जमीन मिळकत घरत कुटुंबीय यांनी नोंदणीकृत खरेदी खताने मुंबई स्थित उद्योजक कैलास सुर्वे यांना अंदाजे रुपये 5,20,000/- रुपयांना विकली. कैलास सुर्वे यांनी सन 1996 मध्ये सदरहू जागेवर व्यवसाय सुरू करून त्या जागेवरून कातकरी कुटुंबास हाकलून लावले.

सदरहू चुकीची नोंद रद्द करण्यासाठी मान उप विभागीय अधिकारी पनवेल यांच्या कोर्टात अपील दाखल केले. गुणवत्ता पाहून चाळीस वर्षांचा विलंब माफ करण्यात आला. त्या विलंब माफीच्या निर्णयाला महसूल मंत्री न्यायालयात कैलास सुर्वे यांनी दाद मागितली. परंतु महसूल मंत्री यांनी देखील विलंब माफ केला आणि उप विभागीय अधिकारी श्री राहुल मुंडके यांनी मुक्ता कातकरी हिच्या बाजूने निर्णय देवून जागा कातकरी कुटुंबाच्या कायदेशीर वारसांच्या नावे करण्यास सांगितले. त्यामुळे आदिवासी समाजातील हा एक ऐतिहासिक विजय ठरणार आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना त्या एक वर्षात कैलास सुर्वे आणि घरत कुटुंबीय ही जमीन मिळकत सोडायला तयार नसल्याने मुक्ता कातकरी हीने उरण पोलीस स्टेशन मध्ये atrocity ची तक्रार दाखल केली असून त्या केस संदर्भात अटक पूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालय पनवेल येथे सुनावणी सुरू आहे.

हा विषय पूर्णपने उरण सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुधाकर पाटील आणि सरचिटणीस संतोष पवार सर यांच्या मार्गदर्शाखाली हाताळला असून मागील दोन वर्ष अनेक लोकांनीं सहकार्य केलेले आहे. त्यात विशेष म्हणजे कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर साहेबांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी हे प्रकरण विशेष लक्ष देवून संबंधित अधिकारी यांना आवश्यक सूचना केल्या आणि मुक्ता कातकरी हिला मार्गदर्शन देखील केले. मान जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे साहेब यांनी ह्या प्रकरणात विधान सभेचे अधिवेशन सुरू असताना मान महसूल मंत्री यांची भेट घेवून हे गंभीर प्रकरण समजावून सांगितले. निवासी उप जिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, उप जिल्हाधिकारी अमोल यादव, उप जिल्हाधिकारी म्हस्के पाटील, तहसीलदार श्री विशाल दौंडकर, नायब तहसीलदार गोतरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व स्तरांवर मदत केली.

हा न्याय मिळवून देण्यासाठी उप विभागीय पनवेल अधिकारी श्री राहुल मुंडके साहेब आणि तहसीलदार श्री भाऊसाहेब अंधारे यांनी जीवाचे रान केले. ह्या केस च्या प्रत्येक स्तरावर तसा प्रत्यक्ष त्यांच्या तालुक्यातील प्रश्न नसताना सुद्धा तहसीलदार पनवेल विजय तळेकर यांनी वेलो वेळी उप विभागीय अधिकारी यांचा समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका बजावली. सर्व पत्रकार बंधू यांनी सर्व स्तरांवर बातम्या देवून सदरहू प्रकरणास प्रसिद्धी दिली. ह्या यशात खरं म्हणजे सामजिक कार्यकर्ते दत्ता गोंधळी, नामदेव ठाकूर, मनीष कातकरी, रत्नाकर घरत यांचा सिंहाचा वाटा आहे. अध्यक्ष सुधाकर पाटील यांचे उत्कृष्ट पद्धतीच्या पत्र व्यवहारच ह्या यशाचे गमक असून संतोष पवार यांनी महसूल विभागातील प्रत्येक कार्यालयात जावून ही केस समजावून सांगितल्यामुळे आणि संस्थेच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे प्रकरण लवकर सुटले आहे. न्यायालयीन पातळीवर सर्व विकलांनी महत्वाचा रोल बजावला त्यात ॲड सुरेश ठाकूर साहेब, ॲड प्रियांका ठाकूर, ॲड सिद्धार्थ इंगळे, ॲड दत्ता नवाले, ॲड दिपाली गुरव, ॲड राहुल मोरे, ॲड अक्षय गवळी यांनी मुक्ता ची बाजू ठाम पने मांडली. प्रा. राजेंद्र मढवी यांनी सर्वांचे आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!