• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

देश आपला पुढे जात आहे ते केवळ नरेंद्र मोदी यांच्या मुळेच -खा. सुनील तटकरे

ByEditor

Jan 14, 2024

अलिबाग येथे महायुतीचा जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा संपन्न

अमुलकुमार जैन
अलिबाग :
जी 20 परिषदेचे यजमान पद भारत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारून ती यशस्वीसुद्धा केली. मात्र विरोधकांनी मोदीजी यांचे साधे अभिनंदन केलं नाही. आशियाई परिषद देशात झाली तेव्हा कौतुक करण्यात आले. देश आपला पुढे जात आहे ते केवळ मोदी यांच्या मुळेच असे प्रतीप्रादन खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील समुद्र किनारी आयोजित महायुती मेळाव्यात केले. यावेळी व्यासपीठावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, आमदार रविंद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आमदार अनिकेत तटकरे, भाजप चे महाराष्ट्र महामंत्री विक्रांत पाटील,माजी आमदार तथा भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, माजी आमदार सुरेश लाड, उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, महिला अध्यक्षा उमा मुंडे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील महेश मोहिते, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार तटकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात महायुतीमध्ये १५ घटक पक्ष, एकाच दिवशी ३६ जिल्ह्यांत समन्वय मेळावे घेण्याचे काम आजच्या दिवशी सुरू आहे. राज्यात महायुतीमध्ये एकूण १५ घटक पक्षांचा समावेश आहे. या १५ राजकीय पक्षांच्या समन्वयातून आगामी लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. काही दिवसापूर्वी महायुतीच्या नेत्यांचा निर्णय झाला आणि महायुती मेळावे घेण्याचे ठरले. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. नऊ वर्षात देशाने प्रगती पहिली आहे. चांद्रयान मोहीम यशवी झाल्यानंतर मोदी यांचे अभिनंदन करण्याचे काम विरोधकांनी केले नाही. मात्र जेव्हा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा करण्यात आला तेव्हा विरोधी पक्षनेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अभिनंदन केले होते. रायगड जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून रायगडचा विकास हा झपाट्याने होत असल्याने भविष्यात रायगडचे चित्र बदलले जाणार आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार काम गतीने करीत आहे. महायुतीवर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. शेतकरी यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजना अंतर्गत ६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असताना राज्य सरकारकडून सहा हजार असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. शिवसेना जिल्ह्यात वाढत गेली. मोदी यांच्यामुळे जिल्ह्यात पक्ष वाढत आहे. आज जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे तीन तीन आमदार आहेत. ज्यांनी आठ वेळा निवडणूक ह्या भाजप सोबत लढविल्या त्या भाजपला नेस्तनाबूत करू असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले होते. मात्र त्यांचा इतिहास कच्चा आहे. एकेकाळी केंद्रात भाजपचे दोन खासदार असताना देखील आता त्याची संख्या ही तीनशेच्याघरात आहे. लोकसभेची निवडणूक 2009 नंतर शेकापला लढण्याची हिंमत झाली नाही . अनेक वेळा विरोधक यांच्याकडून टीका टिप्पणी केली जाते. 2019 मध्ये माझी मदत केली असती तर मी भरघोस मतांनी निवडून आलो असतो. 35 हजार मतांनी मी निवडून आलो तर शेकापमुळे आणि 22 हजाराने पडले ते माझ्यामुळेच अशी टीका माझ्यावर होत आहे. अपयश पचविण्यासाठी मोठे मन लागते. ते विरोधकांमध्ये नाही आहे. इंडिया आघाडी अध्यक्ष कोण आहे हे अधोरेखित नाही. मोदी हेच बहुमताने निवडून येतील. अंतुले यांचे स्वप्न साकार करण्याचे काम महायुती पूर्ण करणार आहे. एका बाजूला सागरी महामार्ग दुसऱ्या बाजूला मुंबई गोवा हायवे, उद्याचा भविष्य काळ देशासाठी महत्वाचे आहे.

राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला आहे तो ऐतिहासिक आहे. त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन. महायुती आघाडी आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असताना विरोधक यांच्या मनात पोटशुळ निर्माण झाले आहे. ते तसेच राहू द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे भरीव विकासात्मक कार्य सुरू आहे. देशातील १४० कोटी जनतेचा विश्वास नरेंद्र मोदी यांनी संपादित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात महायुती सरकार सर्वांगीण विकास करीत आहेत. सरकारने विकासाचे अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे निकाली काढली आहेत. राज्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महायुती सरकारने पूर्ण प्रयत्न आहेत. केंद्र व राज्य सरकारने राबवलेले विकास कार्य जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आगामी लोकसभा निवडणूक १५ पक्षांचा समावेश असलेली महायुती म्हणून लढली जाणार असल्याचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर हे मेळावे संपन्न होत आहेत. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांचे जिल्ह्याचे नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे मुख्य नेत एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यानंतर भाजप सेना युती ही सत्तेत आली. प्रमुख कार्यकर्ते यांचा मनोमिलन व्हावे त्यासाठी मेळावे घेत आहोत. मुंबई गोवा हायवेला जीवदान देण्याचे काम गडकरी यांनी केले आहे. 56 हजार किमी रस्ते त्यांनी केले आहेत. ते मोदी यांच्या मदतीने 22 तारखेला पाचशे वर्षांची लढाई संपुष्टात येणार आहे. आपले मनोमिलन झाले नाही तरी त्याचा फायदाही विरोधक घेतली ही काळ्या दगडावरची रेष आहे. नेतृत्वाने दिलेला आदर्श सर्व कार्यकर्त्यानी पाळावा असे आव्हान बारणे यांनी केले.

आमदार भरत गोगावले यांनी आजचा मेळावा 36 जिल्ह्यात सुरू आहे. आपला मेळावा कधी एकत्र होतो याची वाट कार्यकर्ते पाहत होते. विकासकामांबाबत अनेक नेत्यांनी सांगितले. गरिबांना मोफत धान्य मिळणार आहे. मोदी काय चमत्कार करतील हे कोणीच सांगू शकणार नाही, त्यामुळे त्यांच्या नादाला कोणीही लागु नये. मेळावा तुम्हा कार्यकर्त्यांसाठी आहे व तुम्ही एकत्रीत येणार आहात. खालच्या कार्यकर्त्यामुळे ग्रामपंचायी ह्या विरोधकांकडे गेल्या. खरोखरच आगामी काळात युतीचे सरकार आणायचे असेल तर सर्वांनी एकत्रीत येणे गरचेचे आहे. ग्रामपंचायत हे मुख्य आधार आहे. सातच्या सात आमदार आणि दोन खासदार मोठ्या फरकाने निवडून आणू शकतो. खासदार यांना महाड विधानसभा निवडणूकीत 35 हजाराचा लीड देवू शकतो. मात्र निवडून आणल्यानंतर तूम्ही कोण आणि आम्ही कोण असे नको. कार्यकर्ते हे गरजेच्या वेळी फोन करीत असतात त्यांचे फोन उचलुन मदत करावी. सामान्य जनता ही आपण तिघेही एकत्र असलो तर हसत स्वागत करतील. नाहीतर तुम्हाला नाही आम्हाला नाही घाल… अशी अवस्था होणार आहे. प्रत्येक मंदिरात रोषणाई करावी असे आव्हान करीत एक दिवा रामासाठी लावावचे आहे. असे आव्हानदेखील यावेळी गोगावले यांनी केले.

आमदार रविंद्र पाटील यांनी संगितले की, ह्या जिल्ह्यात खासदार, आमदार यांना निवडून आणण्याचे आहे. देशाचा नेतृत्वला तोड नाही. मोदी सरकार आल्यापासून विकासकामे जोरात सुरु आहेत. विकासकामे करायची असतील तर मोदी गरजेचे आहे. मोदीची जल मिशन योजना ही महत्वाची आहे. अजूनही रायगडचा माणूस हा तहानलेला आहे. त्याला तृप्त करण्याचे काम मोदी यांनी केले आहे. वीस तास काम करणारा प्रधानमंत्री मिळाला आहे. 48 खासदार निवडून येवू शकतील. जिल्हा परिषदही आपल्याकडे आली पाहिजे. ही युती अशीच अबाधित राहू द्या असे आवाहन रवीशेठ पाटील यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!