• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महामार्गावर भटक्या जनावरांचे अपघात; दुर्गंधीने वाहनचालक, पादचारी हैराण

ByEditor

Feb 2, 2024

सलीम शेख
माणगाव :
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. अशा ठिकाणी चारही बाजूने मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असते. या ठिकाणी महामार्गावर नेहमीच भटके कुत्री व इतर प्राणी व्यत्यय आणत असतात. कधी कधी या ठिकाणी अपघात होऊन भटके प्राणी मृत्यू पावत आहेत.

महामार्गावर मृत झालेल्या भटक्या प्राण्यांचे शव रस्त्यावरच पडून राहिल्याने त्यांच्या शवाची हेळसांड होत असून हे शव कुजत असल्याने वाहनचालक पादचारी व स्थानिकांना दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महामार्गावर अशाप्रकारे मृत झालेल्या भटक्या प्राण्यांच्या शवांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महमार्गावर मोठ्या प्रमाणात भटक्या प्राण्यांचे अपघात होत आहेत. त्यांच्या मृत शवाची हेळसांड होत आहे व दुर्गंधी पसरली जात आहे. सदर शव चलून नेण्याची व्यवस्था प्रशासनाने करणे आवश्यक आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!