घन:श्याम कडू
उरण : उरणमधील जागृत नागरिकांनी आज उरण शहरात रॅली काढून EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर यापुढील निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली.

देशभरात EVM मशिनमुळे भाजपा निवडणुका जिंकत आला असल्याचा संशय जनतेत व विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच जगात EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेतले जात आहे. त्याच धर्तीवर भारतातही EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी देशातील अनेक भागातुन जोर धरू लागली आहे. यावेळी तहसील कार्यालयासमोर उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनीही EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. यावेळी रॅली उरण शहरात फिरवून जनजागृती करण्यात आली.