डोंगरात वसलेल्या गावाला वादळाचा फटका
संजय प्रभाळे
बोर्लीपंचतन : म्हसळा तालुक्यातील कोकबळ गावातील घरांचे पत्रे व कौलारू छप्पर मंगळवारी (दि. २७ रोजी) पहाटे वादळात ऊडून मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यामुळे घटना घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

कोकबळ गाव हे म्हसळा तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले आहे. येथे ६५ घरांची लोकवस्ती आहे. मंगळवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्याने २४ घरांचे नुकसान केले आहे. यामध्ये कुणबीवाडीतील १९ तर बौद्धवाडीतील ५ घरांशिवाय दोन समाजमंदिरांची पडझड झाली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास सोसाट्याचा वाऱ्याने पावसाची सुरुवात झाली. त्यामध्ये विद्युत वाहिन्या ही तुटून पडल्या. संपूर्ण गावात अंधार झाला. यामध्येच वादळाचा जोरदार फटका बसल्याने गाववाल्यांना एकमेकांना मदत सुद्धा करता आली नाही. वादळात कोणतीच जीवितहानी झाली नसली तरी मोठया प्रमाणात राहत्या घरांचे नुकसान झाल आहे. त्यामुळे आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घरांची नुकसान झाल्याने पुढे कसं होणार असा प्रश्न ग्रामस्थांपुढे ऊभा ठाकला आहे. आता नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. प्रशासनाकडून पंचनामे झाले असून