विश्वास निकम
गोवे-कोलाड : पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोमवार, दि. २६ जून रोजी पुई येथील ज्ञानेश्वर गंगाराम दळवी यांच्या मालकीचा गोठा कोसळला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
साधारण एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गेली तीन दिवसापासून पावसाने जोरदार सुरवात केली असुन सोमवार, दि. २६ जून रोजी जोरदार पडलेल्या पावसामुळे पुई येथील रहिवाशी ज्ञानेश्वर गंगाराम दळवी यांचा गोठा कोसळला असून या गोठ्यात असणाऱ्या तीन बकऱ्या व सात ते आठ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यांची अंदाजे रक्कम २० ते २२ हजार रुपये तसेच गोठ्याची अंदाजे ८० हजार असे लाखभर रुपयाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी वर्षांपासून पाळलेल्या तीन बकऱ्या व सात ते आठ कोंबड्या कोसळलेल्या गोठ्यात सापडून मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन याची शासनाने दखल घेऊन पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.