अखंड भंडारी समाज सेवा संघ श्रीवर्धन-म्हसळा समाज मंदिराचा खा. तटकरेंच्या हस्ते भूमिपूजन
अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन पर्यटनदृष्ट्या समृद्ध होत असताना येथील निसर्गाला कोणत्याही प्रकारे बाधा पोहचणार नाही असे प्रदूषण विरहित कारखाने आणण्याची प्रयत्न मी करीत आहे तसेच मुंबई वसवली ती फक्त ब्रिटिशांनीच नव्हे तर त्यामागे बहुजन समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचा हात होता त्यापैकी एक म्हणजे दानशूर कै. भागोजीशेठ किर यांच्या मुंबई वसवण्यात मौलिक काम आहे. असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केल. अखंड भंडारी समाज सेवा संघ श्रीवर्धन – म्हसळा समाज मंदिराचा भूमिपूजन सोहळा व भंडारी समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व कै. भागोजीशेठ किर यांच्या जयंती व पुण्यतिथी सोहळा रायगड लोकसभा मतदार संघांचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
श्रीवर्धन म्हसळा भंडारी समाजाच्या नवीन वास्तुसाठी मंजूर असलेल्य 50 लक्ष रुपये निधीच्या इमारतीचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस मतदार संघ अध्यक्ष महमद मेमन, शामकांत भोकरे, तालुका भंडारी समाज अध्यक्ष पांडुरंग तोडणकर, कार्याध्यक्ष विठोबा देवकर, सचिव विश्वास तोडणकर, उपाध्यक्ष रामकृष्ण मांजरेकर, अनंता तवसाळकर, मंगेश बोरकर, सहसचिव स्वप्नील नेवरेकर, खजिनदार कृष्णकांत पिळणकर, सहखजिनदार सुहास पोलेकर, सल्लागार दीपक देवकर, गणेश मांजरेकर, विभागीय अध्यक्ष अरुण मांजरेकर, रितेश मुरकर, चलेंद्र पोलेकर, राजेंद्र बोरकर, माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, अप्पा देवकर, नंदुशेठ पाटील, नरेश बोरकर, प्रतोष कोलथरकर, सुचिन किर, योगेश मांजरेकर, प्रभाकर वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भागोजी शेठ किर एक असं व्यक्तिमत्व आपल्या बहुजन समाजात जन्माला आलं. मराठी भाषिक म्हणून मुंबई सारख्या महत्वाच्या शहरांत ते राहत होते. अनेक अनेक सुविधा करण्याची मानसिकता ज्यावेळी ब्रिटिशांचे गव्हर्नर त्या कालावधीत दाखवत होते. त्यावेळी त्यांना मौलिक सूचना आणि लाखो रुपयांची देणगी देण्याच महत्वाचे कार्य भागोजीशेठ किर यांनी केल. मुंबईतील अनेक सार्वजनिक इमारतीमध्ये त्याच योगदान मोठ्याप्रमाणात असल्याच वक्तव्य यावेळी खा. सुनील तटकरे यांनी केल. मोहमया असलेल्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांत आपलं व्यक्तिमत्व निर्माण करत मुंबई घडवण्यात जे योगदान दिल. अशा भागोजीशेठ किर यांची जयंती आणि पुण्यतिथी त्याचबरोबर महाशिवरात्री व महिला दिन असा विलक्षण योगायोग आणि आशा मुहूर्तावर अखंड भंडारी समाज सेवा संघ श्रीवर्धन – म्हसळा यांच्या समाज मंदिराच भूमिपूजन आज पार पडलं आहे. अठरा पगड जातींना बारा बलुतेदार यांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०वा राज्याभिषेक येत्या सहा जूनला रायगडावर होणार आहे. छत्रपतींना अभिप्रेत असलेल्या अठरा पगड जातीमधील आपण सर्व आहोत. त्यांच्या उत्कर्षांचा कार्यक्रम आज होत असल्याची भावना यावेळी खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. समाज मंदिराच्या उभारणीसाठी पन्नास लाखाचा निधीचा पहिला टप्पा उपलब्ध असून पहिल्या टप्यातील काम पूर्ण होताच दुसऱ्या टप्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही यावेळी खा. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन – म्हसळा येथील भंडारी समाज बांधवाना दिली.