सलीम शेख
माणगाव : लोकसभा निवडणुकीचे बिगुल नुकतेच वाजले असून ७ टप्यांत या निवडणूक होणार असून राज्यातील ११ जागा बळी सेना व कुणबी एकीकरण समिती-महाराष्ट्र राज्य माध्यमातून लढविणार असल्याचे पक्षाध्यक्ष अशोक वालम यांनी गुरुवार दि. २१ मार्च रोजी मुंबई येथे पत्रकार परिषेद घेऊन जाहीर केले. या बैठकीला जेष्ठ नेते कृष्णा कोबनाक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
बळी सेना व कुणबी एकीकरण समिती-महाराष्ट्र राज्य माध्यमातून महाराष्ट्रात एकुण ११ लोकसभा निवडणुकीच्या जागा लढण्यासाठी पक्षाध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वात दि.२१.मार्च, २०२४ रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . या पत्रकार परिषदेत त्यांनी रायगड , रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ, सांगली, नाशिक, उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई , ठाणे, भिवंडी, पालघर, अशा एकुण ११ लोक सभेच्या जागांवर उमेदवार देणार असल्याचे सांगितले. त्यापैकी संघाध्यक्ष भुषण बरे – रायगड लोकसभा, राजाराम पाटील – मावळ लोकसभा, हभप गणेश डांगे – सांगली, धनंजय किनगावकर – नाशिक व श्रावण बाळा इंगळे – उत्तर मध्य मुंबई यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उर्वरित सहा उमेदवार लवकरच जाहीर करु असे सांगण्यात आले आहे.