• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खासदार श्रीरंग बारणे यांनी उरणकरांसाठी काय केले? संतप्त मतदारांचा सवाल

ByEditor

Apr 2, 2024

घनःश्याम कडू
उरण :
मावळ लोकसभा मतदारसंघात उरण मतदार संघ येत असला तरी विकासापासून उरण दूर असल्याचा आरोप उरणच्या जनतेकडून केला जात आहे. गेली दोन टर्म खासदार असलेले श्रीरंग बारणे यांना उरणकरांची मते चालली परंतु विकासाच्या नावाखाली उरण भकास करून पार्किंगचा ठेका घेऊन आपला विकास केला असल्याचा आरोप उरणमधील संतप्त मतदारांकडून केला जात आहे. श्रीरंग चंदू बारणे हे चिंचवड, पुणे येथील शिवसेनेचे राजकारणी आहेत. ते भारताच्या 16व्या लोकसभेचे सदस्य होते आणि भारताच्या 17व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले. ते महाराष्ट्रातील मावळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय शेतकरी आणि श्रमिक पक्षाकडून निवडणूक लढवलेले लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा 1,57,394 मतांनी पराभव केला आणि 3,54,829 विरुद्ध 5,12,223 मते मिळवली आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणारे पार्थ अजित पवार यांचा पराभव केला. 5,04,750 विरुद्ध 7,20,663 मते मिळवून 2,15,913 मतांनी पराभव केला होता. त्यांना 2015, 2016, 2017, 2018 आणि 2019 मध्ये भारतीय संसदेतील सर्वोच्च कामगिरी करणार्‍या संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2020 मध्ये त्यांना 16 व्या लोकसभेतील सातत्यपूर्ण गुणात्मक कामगिरीसाठी ’संसद महारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार पाच वर्षांतून एकदा दिला जातो. गत टर्ममध्येही ते संरक्षण विभागाची स्थायी समिती, रस्ते वाहतूक आणि सल्लागार समितीचे सदस्य होते. 25 वर्षे ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषविलेले आहे. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संसदरत्न हा पुरस्कार सलग पाच वर्ष मिळाला. तो पाच वर्षे मिळाल्याने दुसर्‍या टर्मला ते गतवर्षी महासंसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि चिंचवड हे विधानसभा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघात येतात. त्यामुळे मावळचे खासदार हे पिंपरी-चिंचवडचेही खासदार म्हणून ओळखले जातात. अप्पा म्हणून ते परिचित आहेत. त्यांचा मतदारसंघ घाटावर आणि घाटाखाली विभागलेला असल्याने दोन्ही ठिकाणी त्यांची संपर्क कार्यालये आहेत. शब्दवेध, समर्थ लढवय्या आणि मी अनुभवलेली संसद अशी त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. शिवसेनेकडून दोन वेळा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

खासदार असताना उरण तालुक्यातील खोपटे गाव दत्तक म्हणून घेतले होते. परंतु, बारणे यांनी खोपटे गाव दत्तक घेण्यापलीकडे कोणताही काडीचा विकास केला नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्याच बरोबर उरण मतदार संघातील मतदारांची मते चालतात पण उरणचा विकास करण्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. मात्र, त्यांनी जेएनपीए बंदरात कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणार्‍या पार्किंगचा ठेका मिळवून स्वतः विकास मात्र यातून नक्कीच केला असल्याचा आरोप उरणच्या जनतेकडून केला जात आहे. त्यांचा उरणच्या जनतेशी व विकासाशी संपर्क नसल्याने यावेळी उरणची जनता त्यांना अद्दल घडविण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. त्यामुळे बारणे यांची खासदारकीची हॅट्रिक पूर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होते की अधुरे राहते याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

दुसर्‍या टर्ममध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचे संसदीय कामकाज शिखरावर असले तरी, सामान्य मतदार व जनतेशी त्यांचा संपर्क कमी राहिला आहे. तसेच शिवसेनेत गटबाजी होऊन बारणे हे बाहेर पडत ते शिंदे गटात सामील झाल्याने शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना त्यांना या निवडणुकीत करावा लागणार आहे. दुसरीकडे संजोग वाघेरे-पाटील यांच्याकडून सुरू असलेला बैठका व संपर्काचा झंझावात बारणे यांच्यासमोर कडवे आव्हान बनले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!