वैभव कळस
म्हसळा : म्हसळ्यांत गेले काही वर्ष तालुक्याचा विकास, रस्त्यांचे पसरलेले जाळे, वाढलेले पर्यटन, वाहतुक व्यवसाय, विविध राजकिय पक्षांची व्याप्ती याचा अभ्यास करता आवश्यकतेपेक्षा आधिकारी-कर्मचारी यांची संख्या कमी आसल्याने शहरांत आणि तालुक्यांत पोलीसांची दहशत संपली आहे अशी नागरिकांत खुली चर्चा सुरू असतानाच आज म्हसळा शहरांतील नागरी वस्तीतील मातोश्री पार्क, निता रेसीडन्सी आणि चोचे बिल्डींगचे पार्कींगमधील १ कार आणि ५ मोटरसायकल जाळण्याचा प्रकार सायंकाळी ५ ते ६ दरम्यान घडल्याची फिर्याद प्रा. शिरीष यंद्रकांत समेळ (वय ५५ .रा. निता रेसीडन्सी म्हसळा) याने दिल्याने अकस्मात अग्नी रजी. न.१/२०२३ प्रमाणे पोलीसांनी गुन्हा नोंदविला. सदरचा गुन्हा रविवार, दि. १४ मे २०२३ रोजी सायं ५ ते ६ च्या सुमारास घडला असल्याचे जाणकारांनी सांगितले.
नुकसानीत निता रेसीडन्सी म्हसळा मधील प्रा. शिरीष समेळ यांची मारूती सुझीकी अक्सेस् आणि कार क्रं. एमएच ०६ बीयु ७९४८, चोचे बिल्डींग साळीवाडा येथे हीरो मोटरसायकल क्र. एमएच २९ बीएक्स ३५२८, सुझीकी अक्सेस् मोटरसायकल क्र. एमएच ०६ सीएच १८४१, ज्युपीटर मोटरसायकल क्र. एमएच ०६ सीबी ७३३० यामध्ये मातोश्री पार्कमधील एका भाडोत्र्याची एक मोटरसायकल आणि एक कार सुध्दा पेटविली आहे. मात्र त्यांचा यात समावेश नाही. या सर्व वाहनांचे जळून सुमारे १ लक्ष ५५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या परिसरातील पार्कींगमधील दुचाकींचे पेट्रोल चोरीचे प्रकार अनेक वेळा घडण्याचे प्रसंग झाले आहेत. त्याचाच वापर करून कोणी खेळ म्हणून सुध्दा गाड्या जाळण्याचे प्रकार तर केला गेला नाही ना अशीही शंका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या तीनही रेसीडन्सीमध्ये पोलीस आधिकारी-कर्मचारी भाड्याने राहतात. त्यांचे सर्रास याच मार्गावरुन येणे-जाणे असते परंतु पोलिसांची दहशत संपली याचा प्रत्यय शहरात नेहमी येत आहे.