• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विकासकामांच्या जोरावर खा. सुनील तटकरेंना जनतेचा कौल -बाबूशेठ खानविलकर

ByEditor

Jun 6, 2024

सलीम शेख
माणगाव :
रायगड -रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत विकासकामांच्या व सततचा असणारा दांडगा जनसंपर्क तसेच शाहू, फुले, आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्ष विचार याच्या माध्यमातून बहुजन समाजात काम याच्या जोरावर खा. सुनील तटकरे यांना जनतेने कौल दिला असून ते केंद्रात मंत्री होतील असा विश्वास महाड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केला.

३२ रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय, मनसे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार) गटाचे प्रदेशाध्य्क्ष खा. सुनील तटकरे तर विरोधी इंडिया आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनंत गीते हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तटकरे यांच्या विजयाबद्दल महाड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी प्रसारमाध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले कि, या निवडणुकीत विरोधकांकडून खा. सुनील तटकरे यांच्या बाबतीत अपप्रचार केला गेला परंतु, सुज्ञ मतदार बंधू-भगिनी यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत विकास पुरुष खा. तटकरे यांच्या बाजूनी कौल दिला. विरोधी पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदार संघात जनसंपर्क नसल्याने व त्यांनी केलेले कोणतेही ठळक विकासकाम नसल्याने जनतेने त्यांची जागा त्यांना पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

खा. सुनील तटकरे व तटकरे कुटुंबीयांची जनतेशी बांधलकी आहे. त्यांचा असणारा दांडगा जनसंपर्क व त्यांनी केलेली संपूर्ण मतदार संघात भरीव अशी विकासकामे तसेच शाहू, फुले, आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्ष विचार याच्या माध्यमातून बहुजन समाजात काम करताना त्यांनी आपली दाखविलेली कामाची झलक शिवाय महापूर, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ व कोविड काळात सतत मतदार संघातील जनतेचा विचार करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा खा. तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी विशेष प्रयत्न करून संकटात नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात दिला. या सर्व गोष्टी विचारात घेऊन मतदार संघातील जनतेने खा. सुनील तटकरे यांना कौल देऊन रायगडचा शिलेदार म्हणून केंद्रात खासदार म्हणून निवडून पाठविले असून केंद्रात ते लवकरच मंत्री होतील असा आशावाद व्यक्त करून खा. तटकरे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मेहनत घेतलेल्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच तमाम मतदार बंधू-भगिनींचे ऋण व आभार बाबूशेठ खानविलकर यांनी व्यक्त केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!