उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा; शेतीच्या कामाला वेग
विश्वास निकम
कोलाड : कोलाड परिसरात जोरदार पाऊस बरसाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. तर बळीराजाही शेतीच्या कामाला लागला आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ७ जुननंतर संपूर्ण कोकणात जोरदार पावसाला सुरुवात होईल असे भाकीत वर्तविण्यात आले होते व यावर्षी सरासरी पाऊस उत्तमप्रकारे होईल असे सांगितले होते. हा अंदाज खरा ठरत कोलाड खांब परिसरात शनिवार, दि. ८ जुन रोजी जोरदार पावसाला जोरदार सुरुवात झाली असुन शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यात ९८ हजार हेक्टर क्षेत्रात खरीब हंगामात भातशेतीची लागवड केली जाते यासाठी शेतकरी वर्ग भातपेरणी करण्यासाठी कामाला लागले आहेत.