धरणाची वाडी गावानजिक घटना
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील महाडकडून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो क्र. एमएच ०६ बीडी ३१३२ धरणाची वाडी येथील रस्त्याच्या साईडला पलटी झाल्याने अपघात झाला असुन या अपघातात सुदैवाने वाहचालक बचावला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाचे काम गेली १६ वर्षापासून सुरु असुन या महामार्गाच्या साईडपट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे हे या अपघातावरून दिसून येते. महाडकडून मुंबई जाणारा आयशर टेम्पो धरणाची वाडी येथील वळणावर आला असता टेम्पोची चाके मातीत रुतून सदर टेम्पो पलटी झाला असुन सुदैवाने वाहनचालक बचावला आहे. या अपघात जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून केला जात आहे.