विनायक पाटील
पेण : समर्थ कृपा फोटो स्टुडिओ, खानाव आणि अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमा या विषयावर अलिबागमधील छायाचित्रकारांसाठी भव्य छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचे परीक्षण रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट छायाचित्रकार संदीप वाटवे आणि मच्छिंद्र दवंडे यांनी केले. भीमेश्वर मंदिर देवस्थानचे डॉ. मकरंद आठवले आणि इतर विश्वस्तांनी या स्पर्धेसाठी भिमेश्वर मंदिराचे ठिकाण निवडल्याबद्दल असोसिएशनचे आभार व्यक्त केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मंदार शिर्के याच्या छायाचित्राला देण्यात आला, द्वितीय क्रमांक विराज घरत, तृतीय क्रमांक निलेश दुदम तर वैभव शिंदे आणि रवी गुंड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. समर्थ कृपा स्टुडिओचे संतोष पाटील, विजय पाटील यांनी अतिशय नियोजनबद्ध या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांना अमर मढवी, निलेश दूदम, मनोज पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.
स्पर्धेत 17 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी संदीप वाटवे यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत छायाचित्रकारांनी या डिजिटल युगात अपग्रेड होणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला. रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, अलिबाग असोसिशनचे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश पाटील, जेएमके इन्फोसिसचे संचित कदम आदींच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया पाटील यांनी केले.