विश्वास निकम
कोलाड : ज्या रायगडाला आपण पूजतो, त्याला वंदन करतो, त्याच रायगडाला स्वच्छ ठेवण्याचे काम रायगड किल्ल्यावरील स्थानिक रहिवाशी करीत आहेत, त्यांचा आदर्श महाराष्ट्रातील लोकांनी घ्यावा. आशा लोकांमुळे महाराष्ट्रातील संपत्ती टिकून आहे.
आपण केव्हा तरी एकदा रायगड किल्ल्यावर जाऊन स्वच्छता करण्याची सेवा करतो परंतु, रायगड किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील तसेच इतर देशभरातील असंख्य नागरिक येत असतात. या किल्ल्यावर येणारे हौशेनवशे नागरिक हे कचरा करून जातात. परंतु, येथील स्थानिक रहिवाशी आठवड्यातून एक दिवस रायगड किल्ल्याची स्वच्छता करतात. यांच्यामुळे रायगड किल्ल्याचा महादरवाजाचावरचा भाग स्वच्छ आहे.
महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जवळ पास ३६० किल्ले जिंकले, १६ किल्ले बांधून त्यांची डागडुजी केली आहे. आशा अनेक किल्ल्यांवर पर्यटक येऊन अस्वच्छता पसरून ठेवत आहेत. परंतु, रायगड किल्ल्यावरील स्थानिक रहिवाशी आठवड्यातून एक दिवस स्वछता करून रायगड किल्ला स्वच्छ ठेवत आहेत. यांचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व लोकांनी घेतला तर सर्व किल्ले स्वच्छ राहतील.
-आबा शिंदे
सामाजिक कार्यकर्ते, वरसगांव.